Wednesday, August 13, 2008

आठवणींनी व्याकूळ मन

आठवणींनी व्याकूळ मन
तुझ्या मिठीत सुखावले
कसे सांगू किती सुख
या विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचे
काय करू वर्णन
नजर मिळता नजरेला
धडधडू लागले मन
लटका राग लटके भांडण
सर्व काही गेले विसरून
स्पर्श तुझा होताच
झली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हात
काय वर्णू ती सायंकाळ
समुद्रांच्या लाटांसवे
पुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आले
पाहिले, निघण्याची वेळ झाली
आता येतील विरहाचे क्षण
याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आला
डोळे भरून आले
प्रियकरा,तुझा निरोप घेताना
मनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षण
खूप महत्त्वाचे असतात
पुन्हा भेटण्याच्या आशेने
आयुष्याला नवा अर्थ देतात.....

No comments: