Sunday, May 3, 2009

kavta

तू नसशील


अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.
एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत

आठवतात ते दिवस





िसरली तिचे माझे लहानपनिचे दिवस...पण मला अजुन आठवतायत.....
तिला आठवून देण्यासाठी केलेली ही कविता.....................

आठवतात ते दिवस ..................

अजुनही ते दिवस आठवतात
लहानपणी घडून गेलेले
हातात हात घालून
गावभर फिरलेले......

अजुन त्या वाटेवर
तसेच ठसे आहेत का पावलांचे ?
बघून सांग मला तू
माप बदललेल्या त्या आकारंचे

दु:ख ना आनंदही


दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन

जगत मी आलो असा की


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही !

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो ;
पण प्रकाशाला तरीही हाय , मी पटलोच नाही !

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही !

स्मरतही

तूही ये असाच.... कधीतरी


तूही ये असाच..कधीतरी...
तू पाठवलेला वारा,
काल कानात गुंजी घालून,
मानेखाली गूदगूल्या करून,
अलगद निघून गेला..
निरोप न घेता...
ए, एकदा तूही ये असाच..

बघ ना ! तो वरचा ढग,
कसं आभाळ व्यापून राहीलाय..
जसं..तू व्यापलंस माझं आभाळ..
एकटाच आला आणि..
गूपचूप बरसून गेला माझ्या अंगणात..
ए, एकदा तूही ये असाच...कधीतरी..

कधीतरी माझ्या

चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! -

हसलो म्हणजे




'हसलो' म्हणजे 'सुखात आहे' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे 'दुखले नव्हते' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही ! ...

'हसलो' म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
'हसलो' कारण शक्यच नव्हते दुसरे काही
'डोळ्यामध्ये पाणी नव्हते' ऐसे नाही !

'हसलो' कारण तूच कधि होतीस

वेळ झाली निघून जाण्याची


बोललो होतो कधी
ऐक ही माझी कहाणी
का तुझ्या डोळ्यांत आले
कारणावाचुनी पाणी

गज़लः

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची

नाव घे त्या तुझ्या दिवाण्याचे
काळजी घे जरा उखाण्याची

राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची

लोक आले आताच का आले
वेळ झाली निघून जाण्याची


- सुरेश भट

हासण्याचा, खुळा प्रयास नको




हासण्याचा, खुळा प्रयास नको
आसवांना ,उगाच त्रास नको.......

मी जरी टाळले, वसंताला
ही फुलांची मिठी, कुणास नको?.......

चाललो मी, विराण देशाला
सोबतीला, तुझा सुवास नको.......

मृत्त्यू ,जामीन होऊनी यावा
जीवनाचा तुरुंगवास नको........

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे

सोडले कालच्या किनाऱ्याला
वादळे घेतली निवाऱ्याला
घेतले मी नवे पुन्हा फासे
हारण्याची नशा जुगाऱ्याला

गज़ल :-

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे
साकळे जुना,नवीन घाव पाहिजे......

फत्तरास ही फुटू शकेल पालवी
आसवात तेव्हढा प्रभाव पाहिजे........

अंध:कार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे.....

दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा

मैत्रिण


9:01 PM मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी

इतकी नाजुक इतकी आल्लड


नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ……. १
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २
इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक…………………..३
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा

ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली ना


ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली ना
ती याच अपेक्शेने
की असही होऊ शकेल
की झ-यातून नदी पर्यन्त,
नदीतून खाडीपर्यन्त
आणि खाडीतून समुद्रापर्यन्त जाऊ शकेल ही होडी !
कदाचित पूर्ण भिजणार नाही हिचा कागद
समुद्राशी पोहोचेपर्यन्त
आणि समुद्रातल्या तुफ़ान लाटानाही
लळा लावून तरन्गत राहील ही…
कडाडतील वीजा…लाटान्चे डोन्गर होतील
ख-याखु-या जहाजन्ची शिड

मी नाही !


जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी

ते


त्या वेळी
तू आलास
आणि म्हणालास
" एक्मेकांवर प्रेम करा ! "

त्यांनी तुला क्रुसावर खिळले !


मग
शतकांचा अंधार ओलांडुन
पुन्हा आलास सूर्यकिरणांतून
आणि म्हणालास
" सबको सन्मति दे भगवान ! "

त्यांनी तुझ्यावर गोळ्या झाडल्या !


- सुरेश भट ( रंग माझा वेगळा )