Sunday, December 13, 2009

एक मैत्रीण……

एक मैत्रीण……. 
बोल ना रे काही तरी… 
शी बाबा……आज काहीच का बोलत नाहीस…  
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल… 
चेहरयावर हास्य मग राहिले…  


तिला कुठे माहित… 
बोलक्या ओठानचा 
आज अबोलच होता… 
आवाजासाठी चक्क आतुर होता…  
तीच हसन…ते लाजन… 
तीच रुसन..तर कधी भांडन… 
तिचे प्रश्न…ती उत्तर… 
कधी सवांद… तर कधी वाद…  
कोण होती ती….??? 


नव्हती रक्ताची… ना नात्याची….  
परी होती ती या मनाची… 
स्नेहच्या बंधाची…. अंतरीच्या गाभ्याची…  
आठवणींनच्या काही गोड क्षणंची…  
होती ती श्रावण सर… 
वाळवंटातही ओले चिम्ब करणारी… 
की होती ती काजवा… 
अंधारया आयुष्याची…  


रेशीम गठिंचा बंध होता…  
ह्या दोन खुळ्या मनांचा… 
मैत्रीचा की प्रेमाचा…  
हा प्रश्न नव्हता मनांचा…  
तीच्या सोबतचा वेळ क्षणात संपून जाई… 
परत भेटीची ओढ़ आता अंतरी राहून जाई…  
मी स्वर्ग नाही पहिला… 


तीच्या सोबतचा प्रतेक क्षण

Saturday, December 5, 2009

एक कळी……

अशाच एका सकाळी




सहज भेटली एक कळी…….

कळी खूप नाजूक होती…….

तरी फुलावे वाटे तिला सर्वांसाठी…….

कधी वारा तिज त्रास देई…….

लटपटे शरीर पण तशीच उभी राही…….

पाऊस खुपच कधी वेगाने बरसू पाही…….

अस्तित्व टिकवायची धडपड सारे जग पाही…….

तशीच फुलू पाही ती जोमाने…….

जरी झाला व्याकुळ ह्या उंन्हाने…….

देव नेहमीच तिची परीक्षा घेई…….

का असे ?तिने कधी प्रश्न केला नाही…….

नेहमीच ती आघात सोसू पाही…….

तरी खोटे हास्य नेहमी ओठतून वाही…….

प्रवास ना माहीत तिज तिच्या आयुष्याचा…….

तरी एक संघर्ष सगळी नाती टिकवण्याचा…….

सुकली जरी ती,तरी नवा जन्म घेईल…….

असंख्य वादळे पुन्हा झेलेल…….

अस्तित्व स्वताचे टिकवून ठेवेल……

एक दिवस तीचाच येईल…….

नातं तुझं माझं…….

“नातं आपलं कप आणि बशीचं..


कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..

रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप आठवायचं..

आठवता आठवता हळूच गालात हसायचं..



नातं आपलं चहा अन् दुधाचं..

दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..

कधी रुसायचं, कधी हसायचं,

पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच विसावायचं..



नातं आपलं हळव्या प्रेमाचं..

एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..

एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं नावाजायचं..

एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं स्वतःला हरवायचं..



नातं आपलं साता जन्माचं,

सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..

कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..

पण आपण सदैव बरोबरच रहायचं..”

तुझ्या शिवाय जगण्याचा

विचार आता करतो ….

जीवन इथेच थांबलं बघ माझं

आता मरन्याचा विचार करतोे …..



तुझ्या पासून दूर जाताना

मन जड़ झाले होते

चेहरा हसरा दाखवला तरी

डोळे भरून आले होते …

म्हणून तर बघा – I LOVE YOU

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं




आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं

जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं

यातला फरक समजू लागतो

नाही नाही म्हणता आपणही

प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर

ते हसायला शिकवतात

जीवन हे खऱ्या अर्थाने

जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात….

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं

त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,

प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी

त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ……..

असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ

जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर

एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा

” I LOVE YOU “

असाच आहे मी…

असाच आहे मी…

चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा

वाऱ्याबरोबर दुर

फिरायला जाणारा

हिरव्या सावलीत

कोठेतरी रमलेला

असाच आहे मी

कवितेतल्या चारओळीत

कोठेतरी हरवलेला



मला मी सांगू कसा वाटतो

थेंब थेंब जसा रोज साठतो

शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो

जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो



टाळीला जेव्हा टाळीही मी देतो

खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,

कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो

तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो



मला मी सांगू असा वाटतो …



कधी कुणी भावनांचा वसंतही देतो

तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो

कधी डोळ्यात नकार साचतोच फार

तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो



मला मी सांगू असा वाटतो …



रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो

काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो

आणि सायंकाळी मात्र मी एकटाच उरतो….

अरे कारण तो एकांतही मला उपभोगायचा असतो…आणि काय…



आणि खरच असाच आहे मी…