Tuesday, August 19, 2008

माणसं

एकदा कधी चुकतात माणसं, सारंच श्रेय हुकतात माणसं....प्रेम करून का कधी प्रेम मिळतं, सावकाश हे शिकतात माणसं..... गंधासाठी दररोज कोवळ्या, कितीक फुलांस विकतात माणसं....शतकानुशतके कुठलिशी आस, जपून मनात थकतात माणसं....जुनाट जखमा भरू लागल्या की, नविन सिगार फुकतात माणसं....हरेक पाकळी गळूनिया जाते, अन् अखेरीस सुकतात माणसं.....नको रे असं कडू बोलू "रव्या", उगाचच किती दुखतात माणसं..........

No comments: