Tuesday, August 19, 2008

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणून....................फूल मागायचं नसतं...गंध आवडला फुलाचा म्हणुनफूल मागायचं नसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....परक्यांपेक्षा आपलीच मानसंआपल्याला नेहमी दगा देतातएकमेकांच्या पाठीवर मगनजरे आडून वार होतातभळभळणा-या जखमेतूनविश्वास घाताचं रक्त वाहतंछिन्नविछीन्न जखमेला तेव्हाआपणच पुसायचं असतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपलं सुःख पाहण्याचा तसाप्रत्येकाला अधिकार आहे॥पण; दुस-याला मारुन जगणंकुठला न्याय आहे...माणूस म्हणुन माणसावरखरं प्रेम करायचंआपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचंजगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपल्याला कोणी आवडणंहे प्रत्येक वेळीच प्रेम नसतंआकर्षणाचं स्वप्नं तेआकर्षणंच असतं...मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...पण् जे चकाकतंते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतंमन् आपलं वेडं असतंवेडं आपण व्हायचं नसतं॥मन मारुन जगण्यापेक्षाअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

No comments: