Tuesday, August 19, 2008

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

अश्रुंची कहाणी.....................एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......'ए आपण असे कसे रेना रंग, ना रूप,नेहमीच चिडीचुप,आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,किनारा ही नाही साधा या पापण्याला............दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,खुप विचार करून तो बोलला,रंग-रूप नसला तरी,चिडीचुप असलो जरी,आधार आपण भावनांचा,आदर राखतो वचनांचा,सान्त्वनांचे बोल आपण,अंतरीही खोल आपण,सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,बंधनात नाही कोणी बंधवु शकत,उद्रेक आपण मनातील वेदनांचा,नाजुक धागा वचनातील बंधनांचा,भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,म्हणुनच,आपले बाहेर पड़णे भाग आहे,आपल्यामुलेच आज हे जग आहे.अशीच आपली कहाणी.........ऐकून ही अश्रुची वाणीअश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

No comments: