Thursday, May 19, 2011

प्रेम तुझं खरं असेल तर...

प्रेम तुझं खरं असेल तर


जीव तुझ्यावर ओवाळेल ती

स्वत:च्याचं भावनांचं मन

शेवटी ती मारेल तरी कीती..



भावना तुझ्या शुद्ध असतील, तर

तीही त्यात वाहून जाईल

मनावर अमृत सरी झेलत

तीही त्यात न्हाहून जाईल..



विचार तुझा नेक असेल, तर

तीही तुझा विचार करेल

हृदयाच्या तिच्या छेडून तारा

सप्तसूरांचा झंकार उरेल..



आधार तुझा बलवान असेल, तर

तीही तूझ्या कवेत वाहील

मग, कितीही वादळं आलीत

तरी प्रित तुमची तेवत राहील..



आशा सोडण्या इतकं

जिवन निराशवादी नाही रे

तिला न जिंकता यावं इतकं

मानवी हृदय पौलादी नाही रे..



पण, मित्रा जर ती नाहीचं आली

तरीही तू हार मानू नकोस

तू तर प्रामाणिकपणे खेळलास

आयुष्याला जुगार मानू नकोस..



शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं

थांबत नाही ते कोणासाठी

घे भरारी पुन्हा गगनी

नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

.........

No comments: