Tuesday, October 27, 2009

कोणी गेलं म्हणुन…..

कोणी गेलं म्हणुन…..

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थाम्बवुन ठेवायच नसतं

जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लाम्बवुन ठेवायच नसतं

आठवनिंच्या वाटावरुण
आपल्या स्वप्नापर्यंत पोह्चायच असतं

आभालांपर्यंत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायच असतं

कसं ही असल आयुष्य आपलं
आयुष्य थाम्बवुन ठेवायच नसतं

दिवस तुझा नसेल ही, रात्र तुझी असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायच असतं

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगण मागायच असतं

कोणी गेलं म्हणुन…..

No comments: