Tuesday, August 19, 2008

कोणी गेलं म्हणुन ........

कोणी गेलं म्हणुनआपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं ,जगायचा असतो प्रत्येक क्षणउगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं .आठवणींच्या वाटांवरुनआपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं ,आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधीत्याला खाली खेचायचं असतं.कसं ही असलं आयुष्यं आपलंमनापासुन जगायचं असतं ,कोणी गेलं म्हणुन उगाचआयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं .दिवस तुझा नसेलही , रात्र तुझीच असेलत्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं ,तुझ्याच वेड्या श्वासांकडेथोडं जगणं मागायचं असतं .कोणी गेलं म्हणुन ........

No comments: