आषाढातल्या मेघासम
भरुन आलो कितीदातरी
पण तू भिजशील म्हणून
बरसलोच नाही कधी
सप्तरंगी रंगात तुझ्या
रंगून गेलो कितीदातरी
पण तुझा रंग ओळखशील
म्हणून बोललोच नाही कधी
कितीदातरी बहरून आलो
प्रजाक्तासारखा .. तू भोवती असताना
पण कधी सांगितलं नाही तुला ..
सुगंधानं भोवळ येईल म्हणून
तुझ्याकडे येताना कितीदातरी
ओंजळ भरभरून फुलं आणली होती ..
पण ओंजळ लपवली मी ,
माझ्या फुलानीही तुझे हात पोळ्तील की काय म्हणून
कितीदातरी कविता माझी
शब्दांची शीडं भरुन हाकारली होती तुझ्याकडे
पण ओळींच्या मधलं
सांगितलं नाही तुला ..तू बावरशील म्हणून ..
कितीदातरी भेटलो आपण ,
बोलताना अडखळलो आपण
पण अडखळण्याचे अर्थ कधी
विचारले नाहीत तुला..कदाचित तुला ठेच लागेल म्हणून ..
सखे, तूच सांग आज मी
ओंजळ माझी कशी लपवू ?
ओंजळीतल्या फुलांचे
श्वास कसे मी रोखू ?
...निघालीसच सखे , तर
आज तशी तू जाऊ नको
माझी ओंजळ हाती घेतल्याशिवाय
निरोप माझा घेऊ नको
माझ्या ओंजळीतली चार फुलं
वेणीमध्ये खोचून जा
'तूझी होते रे ... काही क्षणतरी ..'
असं एकदाच लाजून सांगून
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment