Wednesday, October 20, 2010

मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण

मैत्री म्हटली की


आठवतं ते बालपण

आणि मैत्रीतुन मिळालेलं

ते खरंखुरं शहाणपण



कोणी कितीही बोललं तरी

कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी

मित्रांची नावं सांगायची नाही



मैत्रीचं हे नातं

सगळ्या नात्यांत श्रेष्ठ

हे नातं टिकवण्यासाठी

नकोत खुप सारे कष्ट



मैत्रीचा हा धागा

रेशमापेक्षाही मऊ सुत

मैत्रीच्या कुशीतच शमते

मायेची ती सुप्त भुक



मैत्रीच्या सहवासात

श्रम सारे विसरता येतात

पण खरे मित्र मिळवण्यासाठी

काहीदा कितीतरी पावसाळे जातात



मैत्री म्हणजे

रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दवात भिजुन

चिंब-चिंब नाहली



मैत्रीचे बंध

कधीच नसतात तुटणारे

जुन्या आठवणींना उजाळा देउन

गालातल्या गालात हसणारे

No comments: