Friday, September 17, 2010

तु परत येऊ नकोस, जुन्या आठवणी जागवायला,

तु परत येऊ नकोस,


जुन्या आठवणी जागवायला,

आधीच खुप दिवस लागलेत,

मनावरील जखमा भरायला.....



दुःख अंतरी दाबुन,

एकांतामध्ये रडत असतो,

म्हणुनच का कोणास ठावुक,

सर्वांसोबत हसत असतो.....



तु आयुष्यात परत येऊ नकोस,

तुझे स्थान मिळवायला,

आधीच फार वेळ लागलाय,

त्या सर्व आठवणी विसरायला.....



पण...

काहीही असले तरी........



तुला शोधायला तरी,

नजर माझी फिरत असते,

आकाशीचा चंद्र पाहील्यावर,

तुझीच आठवण दाटुन येते......



तुला विसरण्याचा,

आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,

पण ही कवीता लिहीता लिहीता,

पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...

No comments: