Wednesday, June 3, 2009

दिसं गेले, रात्र गेली

दिसं गेले, रात्र गेली
काळ सरला सरसर,
यादरम्यान ठावुक नाही तुला
माझ्या मनाची झाली किती मरमर...

मी तुला विसरलो
असं साहजिकपणे तुला वाटलं असावं,
म्हणुन काय तू आपलं
इतके दिवस रुसावं...?

घाईगर्दीचं जीवन असतं हे
अनाहुतपणे काही गोष्टी घडतात,
चार क्षण सुखासाठी
सारेच इथे धडपडतात...

वेडाबाई कुठली,
आताशा तू खुप त्रास देतेस,
थोडा-थोड़का उरलेला माझा
जीव सुद्धा घेतेस..

पुरे झाले आता
कधी येणार आहेस ते सांग,
येतांना मात्र आपल्यासाठी
देवाकडे खुप सारं सुख माग...

No comments: