Thursday, February 26, 2009

तुझ्याविण

बोलायाचे सारे शब्दओठांत मिटले,बांधायाचे सारे बंधक्षणांत सुटले.
नेमाचे बोलणे आताथांबले सदाचे,जपायाचे नाते आतामनात लपले.
आठवणी ओल्या गेल्याअश्रुंत वाहून,कोरडे ते अभ्र माझ्याउरात दाटले.
कठीण हे जीणे माझेकधीच नव्हते,सोपे तुझ्याविण मलानाही सापडले.-हर्षल

No comments: