कसलं रे हे तुझं logic.......?
म्हणे दूर राहिलो की समोरच्याला आपली किंमत कळते
कसलं रे हे तुझं logic.......?
मला मुळीच कळत नाही
तू बोलेनासा झालास ना मग
हे तुझ प्रेम आहे की राग.......
याचंही उत्तर मिळत नाही
मनाची गुंतागुंत होते sms करावा,
phone करावा की गप्पं रहावं?
खुपदा sms type करून delete होतो,
सारखं number dial करून cut केला जातो...
माहितेय मला दुरावा तुला असाह्य होतो
पण नाही बोलता आलं कधी म्हणून प्रेम का कुठे आटत?
बघ ना आभाळही कधी-कधीच काळभोर होऊन दाटत
आणि क्वचितच क्षितीजापलीकडे जमिनीला भेटत
कस पटवून देऊ तुला मलाही तुझ्याइतकाच
दुरावा असाह्य होतो.
फरक इतकाच आहे.....
मी लिहून सांगते आणि तू
न बोलता खूप काही बोलून जातो.....!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment