Wednesday, March 30, 2011

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं ......

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

की सर्व जग त्याला सुंदर दिसू लागतं.
फुलांचा सुवास त्याला प्रफुल्लित करून टाकतो,
पक्ष्यांची किलबिल जणू त्याला मधुर गाणं वाटू लागतं...
जगणे हे तर आत्ताच सुरु झाले आहे याचा आनंद मिळू लागतो.
एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

कामातील नीरसपणा जाऊन त्यात उत्साह येऊ लागतो,
काम काम न राहता तो एक खेळ आहे असे वाटू लागतं .
रात्रीच्या वेळी आकाश पाहताना एक वेगळीचं मजा येऊ लागते,
झोपल्यावर स्वप्नांच्या दुनियेत जगण्याची एक वेगळीच किमया वाटू लागते.

हे सर्व असचं घडत राहत
कारण

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे....


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

आयुष्यातली एकच इच्छा......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

Wednesday, March 23, 2011

जीवनाचे मोल


जीवनाचे मोल



जीवनाचे मोल, मला कळून आले
जेंव्हा माझे प्रेत, अवघे जळून आले

बघ उमलून आली, पहाटेची लाली
बोचर्‍या थंडीत येती, रोमांच गाली
बघ शुक्राचे रंग, कसे उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

डोंगरामागून सुर्याचे, लाल बिंब आले
गवताचे हिरवे पाते, ओलेचिंब झाले
दरीतले धुके बघ, विरघळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

पाखरांचा थवा बघ, रानात चालला
किलबिलाट त्यांचा, कानात चालला
वासरु बघ गाईकडे, पळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ शाळेत पोरांचा, घोळका चालला
कोण आले कोण नाही, घोळ का चालला?
सरळ कोणी, कोणी मागे वळून चाले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ आमराईची, ती गर्द सावली
गाई गुरे उन्हाची, तेथे विसावली
वासरु हुंदडून पुन्हा, तेथे वळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

तिन्ही सांजेला पावसाचे, चार थेंब आले
स्वागताला त्यांच्या, बाहेर कोंब आले
नको झळा त्यांना, उन टळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ सांजेला ते, किती रंग झाले
ढग मावळतीचे, इंद्रधनूत न्हाले
हळूच चांदण्याचे थवे, उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

इथे श्वासांची मंदी आहे .....


इथे श्वासांची मंदी आहे .....



जीविताचे नाक दाबले गर्दीने
नव्या अभ्रकास तोंड उघडणे
बंदी आहे ......
मोजकेच आहेत वाटून घ्या
इथे श्वासांची
मंदी आहे.............

गोर गरीब असाल तर मरून जा
इथे श्रीमंतांचीच चांदी आहे
लुटा किवा तुटून पडा
फाटक्याना हीच शेवटची
संधी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे....

श्वास तोडकेच तुझे
काड्यांचे कुंपण...
इथे वादळाना चढलेली
धुंदी आहे.................
ते ठेवतील जपून बरेच
त्यांचे वाडे
चिरेबंदी आहे.........
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे...

विकले जातील
खरीदले जातील
श्वास हे ....हिसकून
घेतले जातील
तू सावध राहशील किती
डोळ्या देखत ते
चोरले जातील

विश्वास राहील गहाण इथे
श्वासांचीच भूक नि तहान
मरण्याचे भाव वधारतील
नि जीवन होयील लहान
सावरशील किती प्राण
पाखरा ....
उडणारयांची नांदी आहे
एक घे मिळाला तर श्वास
कारभार इथे सुरु
अंधाधुंदी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे.

इथे श्वासांची मंदी आहे .....



जीविताचे नाक दाबले गर्दीने
नव्या अभ्रकास तोंड उघडणे
बंदी आहे ......
मोजकेच आहेत वाटून घ्या
इथे श्वासांची
मंदी आहे.............

गोर गरीब असाल तर मरून जा
इथे श्रीमंतांचीच चांदी आहे
लुटा किवा तुटून पडा
फाटक्याना हीच शेवटची
संधी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे....

श्वास तोडकेच तुझे
काड्यांचे कुंपण...
इथे वादळाना चढलेली
धुंदी आहे.................
ते ठेवतील जपून बरेच
त्यांचे वाडे
चिरेबंदी आहे.........
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे...

विकले जातील
खरीदले जातील
श्वास हे ....हिसकून
घेतले जातील
तू सावध राहशील किती
डोळ्या देखत ते
चोरले जातील

विश्वास राहील गहाण इथे
श्वासांचीच भूक नि तहान
मरण्याचे भाव वधारतील
नि जीवन होयील लहान
सावरशील किती प्राण
पाखरा ....
उडणारयांची नांदी आहे
एक घे मिळाला तर श्वास
कारभार इथे सुरु
अंधाधुंदी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे.

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या
रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू
पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी
असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर
निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने
माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव
....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या
रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू
पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी
असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर
निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने
माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव
....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

पहाटेच्या गुलाबी थंडीत आठवणींची ऊबदार रजई दिलीस
चांदण्यांच्या शीतल प्रकाशात उजळणारी स्वप्नांची रात्र दिलीस

एका क्षणातच जणू आयुष्य जगण्याचा हर्ष दिलास
दुःखी निराश मनाला मायेचा हळूवार स्पर्श दिलास

आकांक्षांचे ढासळलेले मनोरे पुन्हा एकदा उभे केलेस
हरवलेले सूर छेडूनी अंतरी प्रीतीचे गीत फुलविलेस

आयुष्यात ज्याची कमी होती ते सारे काही पदरात टाकलेस
एका कोमेजलेल्या कळीला जणू पुन्हा नवजीवन दिलेस

काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ...

खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !!!

आठवणीच काय ..केव्हा ही येतात..

आठवणीच काय
केव्हा ही येतात
तू दाखवलेल्या "सव्प्नाची"
आठवण करून देतात


तुझी आठवण येते आणि
मी "अश्रुच्या" पावसात भिजते
आभाळ फाटून वीज कोसलावी
तशी अवस्ता माझी होते
आठवण येताच सख्या तुझी
ओलावली ही पापन्याची कडा
वेडे "डोळे" उगीच पाहत आहेत तुझी वाट
अन अनावर होताच वहातयेत अश्रुंचे पाट

Thursday, March 10, 2011

एक पाखरू मनातलं,

एक पाखरू मनातलं,


खूप दिवसापासून जपलेलं,

आताशा कुठे भिरभिरू लागलेलं,



एक पाखरू मनातलं,

कधी खूप आनंदून जाणारं,

तर कधी लगेच खट्टू होणारं,



एक पाखरू मनातलं,

खूप खूप अगदी जीवापाड प्रेम करणाऱ,

अन तेवढ्याच रागाने लाल-लाल होणारं,



एक पाखरू मनातलं,

पावसात ओलं-चिंब होऊन नाचणारं,

रणरणत्या उन्हात खूप कष्ट करणारं,



एक पाखरू मनातलं,

मोठ्या कारणावरून मुसमुसून रडणार,

आणि छोट्या आनंदासाठी लढणार,



एक पाखरू मनातलं,

कायम स्वप्नात रमणार,

वास्तवाशी बिनघोरपणे झगडणार,



एक पाखरू मनातलं,

मायेच्या कुशीत अलगद शिरणार,

मोठ होऊन समजुतदारपणे थोपटणार,



एक पाखरू मनातलं,

आवडतं गाण हळुवार गुनगुनणार,

स्वतःच अस्तित्व ताकदीने शोधणार ,



एक पाखरू मनातलं,

आपल्या माणसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल,

तितक्याच तन्मयतेने वेगळी वाट नव्याने हुडकणार,



एक पाखरू मनातलं,

वाईट अनुभवांना भेदरणार,

अन दिलखुलासपणे हसत सर्वांगाने स्वीकारणार,



एक पाखरू मनातलं,

खूप घाबरून भुरकन उडणार,

पण "वेड" होऊन आकाशाकडे झेपावणार,



एक पाखरू मनातलं,

एक होती मैत्रीण

एक होती मैत्रीण


होती ती जिवलग



हसवत होतो एकमेकांना

ओरडत होतो एकमेकांना



बोल्याशिवाय राहवत नव्हते

भेटल्याशिवाय जमत नव्हते



प्रेम माझ्यावर करत होती

मैत्रीसाठी गप्प बसत होती



पण केली मी चूक मोठी

न मिळणारे दिले प्रेम तिला



त्या प्रेमाने मैत्रीचा वध केला

नकळत तिने मैत्रीचा शेवट केला



आता हसायला जमत नाही

डोळ्यातून पाणी येत नाही



पुन्हा अशी मैत्रीण भेटणार नाही

या जन्मी तरी मी मैत्री करणार ना

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??


जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..

पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..

एवढ्या खोलवर जाईल..

मुळापासून उखडलं तरी..

थोडी आठवण शिल्लक राहील..

ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..

निष्ठुरता डोळ्यांत उरेल..

माझ्या डोळ्यांत मात्र..

काकुळतीने.. पाणी तरेल..

भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..

तुझीच आठवण करुन देईल..

वेडं.. मनाचं पाखरु..

पुन्हा तुलाच शोधत राहील..

अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..

न्हा उभा राहीन..

तुझ्या पलीकडे असणाऱ्या..

अंतिम ध्येयाला पाहीन..

आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..

माचं पर्व अधुरंच राहील..

तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..

अपुरंच जाईल..

मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

असं.. कधी वाटलंच नव्हतं

आयुष्य हे.........!!

आयुष्य हे.........!!


जीवन एक शाळा म्हणून...

जन्मभर शिकत राहिलो...

मोठा न होता आले कधी....

फक्त happy birthday ऎकत वाढत राहिलो.



कोणाला न देऊ शकलो काही .....

जन्मभर मी मागत राहिलो...

आला दिवस गेला तैसा.....

घटका फक्त मोजत राहिलो.



गुन्हा न करताही.......

शिक्षा फक्त भोगत राहिलो....

अहो......! वाईट नाही मी खरच..........!!

आयुष्यभर पटवून देत राहिलो.



एकामागून एक गेले.........

नवे नाते जोडत राहिलो.......

भेटेल का कोणी जीव देणारा.....

हेच फक्त शोधत राहिलो.



उरला न भरोसा कुणाचा........

फक्त दिलासे मनाला देत राहिलो...

रडण्याची न मुभा मला....

दुसर्यांचे डोळे पुसत राहिलो.



शपथेवरचे खेळ इथले.......

खेळत आणि हरत राहिलो.......

जखमेवरती हात ठेउनी..........

आयुष्यभर हसत राहिलो

एक मैत्री अशी हवी

एक मैत्री अशी हवी ........


पाहता क्षणी मन भरून यावे.......



एक

मैत्री अशी हवी ........

मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव.........



एक

मैत्री अशी हवी ........

मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न

व्हावे



एक मैत्री अशी हवी ........

अवगुनाकडे हक्काने बोट

दखावानारी

आणि आदराने चूका कबूल करणारी



एक मैत्री अशी हवी

........

प्रेमाचा स्पर्श असलेली

प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी

फुलावनारी



एक मैत्री अशी हवी ........

विश्वसाने विश्वास

सम्पादुन

मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारी



एक मैत्री अशी हवी

........

भविष्यत कितीही नाती जोडली गेली

तरी मैत्री या नत्याला अंतर

न देणारी ....

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.



2) आयुष्यातल्या

कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.



3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य

असं काहीच नाही.



4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.



5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.



6) आवडतं तेच

करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.



7) तुम्ही किती जगलात

ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.



8) अश्रु येणं हे माणसाला

ह्रदय असल्याचं द्योतक आहे



9) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर

अपयश पचविण्यास शिका.



10) स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य

इतरांच्या त्रुटींकडे लक्ष

" मन "


आथांग, विशाल असं काहीतरी असतं

वेगलं काही नसून ते अपलं मन असतं;

अस्थिर, चंचल असं काहीतरी असतं,

खरंच ते आपलं वेडं मनंच असतं



काही क्षण फारंच सुंदर असतात,

ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,

काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,

त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात,



जगण्यासाठी प्राणवायु मानसास लागतो,

सोबत एक चांगलं मनसुद्धा लागतं,

जगण्यासाठी मनासंसुद्धा एक छानसं स्वप्नं लागतं,

तुटलं जर ते, तर बिचार्‍या मनालाही लागतं



क्षणात हसवणारं,क्षणात रडवणारं हे मनंच असतं,

रहस्यमयी,फसव्या गोष्टींन्चं ते गोदामंच असतं,





जर हे मन कायम रिकामंच राहिलं असतं

तर वाटतं किती बरं झालं असतं,किती बरं झालं असतं....

पाने आज आयुष्याची

पाने आज आयुष्याची


थोडी चाळून पाहिली

चोळामोळा झालेल्या

त्या पानांवर ...

सुरकुत्या पडलेली

अक्षरे फक्त तेव्हडी राहिली



बालपण पहिल्या पानावर

हसत खेळत होत ...

वाटचाल करीत ...नाजूक पावलांनी

तरुण एक पान....

२५ पाने मागे सोडून ..

दिमाखात स्वताच्या पायावर

एकटच उभ होत....



जबाबदारीच एक पान..

दुमडलेल ..थकलेल भासल

शब्द परिवार माझा ...

म्हणत त्याच पानाला

वोघळलेला घाम पुसत हसलं..



एकावर एक बरीच पाने होती

काही कोरी करकरीत

न वाचलेली ....

काही वाचून वाचून ....

मळलेली ...



शेवटास एक पान ..

खूप जीर्ण झालेलं

फाटलेल ...स्वतावर लिहिलेल्या

शब्दांना कस बस ..त्याने

अंग चोरून सवरलेल ...



पण ते दुखी दिसलं नाही..

किवा हसलही नाही ...

शेवटी असल्यावरही..

सुरवात आहे ...

असच म्हणताना भासल काही..



बऱ्याच पानावर मला

काही जागा सुटल्यागत दिसल्या

पण त्याही तेवढ्याच ...

समाधानी वाटल्या .....