Friday, January 28, 2011

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
तुझी नि माझी मैत्री एक
गाठ असावी
कुठल्याही मतभेदाला तेथे
वाट नसावी
मी आनंदात असताना हास्य तुझे असावे
तू दुःखात असताना अश्रु माझे असावेत
मी एककी असताना सोबत तुझी असावी
तू मुक असताना शब्द माझे असावेत

Monday, January 24, 2011

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट




कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..



आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं



सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..



फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं



कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं



आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ



हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..



मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा



अन् जणू दरवळणारा मारवा



अंगावर घ्यावा असा राघवशेला



एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...



ऍकत रहावी अशी हरीची बासरी



अस्मानीची असावी जशी एक परी...



मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी



दु:खावरची हळुवार जादूची झप्पी



मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात



नेहमीकरता असणारी तुझीचं साथ

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास


जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,

दुःख आले जिवनात तरीही

कायम साथ देत राहातात.



काही माणसं मात्र

म्रुगजळाप्रमाणे भासतात,

जेवढे जवळ जावे त्यांच्या

तेवढेच लांब पळत जातात.



काही माणसे ही गजबजलेल्या

शहरासारखी असतात,

गरज काही पडली तरच

आपला विचार करतात,

बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात

काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.



मात्र काही माणसं ही

पिंपळाच्या पानासारखी असतात,

जाळी झाली त्यांची तरी मनाच्या

मैत्री करत असाल तर

मैत्री करत असाल तर


पाण्या सारखी निर्मळ करा

दूरवर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल अशी करा



मैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट करा

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल अशी करा



मैत्री करत असाल तर

दिव्यातल्या पणती सारखी करा

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात अस एक मंदीर करा



मैत्री करत असाल तर

निसर्गापेक्षा ही सुंदर करा

शेवट पर्यंत निभावण्या करता

लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण,

""लाख क्षण अपूरे पडतात


आयुष्याला दिशा देण्यासाठी

पण, एक चुक पुश्कळ आहे

ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात

यशाचं शिखर चढण्यासाठी

पण, जरासा गर्व पुरा पडतो

वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण

नवसाला न पावण्यासाठी

कितींदा जिगर दाखवतो आपण

इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो

विजश्रीवर नाव कोरण्यासाठी

पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो

जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात

आयुष्याचं गणित सुटण्यासाठी

कितीतरी अनुभवातनं जावं लागतं

आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते

नात्याला जिवनभर तारण्यासाठी

एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे

ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

Thursday, January 20, 2011

आठवणींचे कपाट ...


आठवणींचे कपाट ...


काय कराव काही सुचत नव्हत
काम तर होत पण करायचं नव्हत
शांत बसायला कधी जमलच नाही
बोलायलाही तेव्हा जवळ कुणी नव्हत

घरभर उगीच मग तसाच फिरत राहिलो
अडगळीच्या खोलीत जरा हळूच शिरलो
समोरच दिसलं ते छोट जून कपाट
उघडावं की जाव हाच विचार करत राहिलो

न राहवून शेवटी मी उघडलंच ते
करकरल थोड ... थोड डगमगल ते
धुळीचा एक लोट मग हवेत उठला
जळमट काढून नीट निरखल ते

काय काय नव्हत त्या एवढ्याश्या कपाटात
अख्ख बालपण माझ ठासून भरलेलं त्यात
एक एक कप्पा एक किस्सा होता सांगत
साठवायलाही आज पण जागा नव्हती घरात

मी जिंकलेल्या त्या पिशवीभर गोट्या
भातुकलीच्या खेळातल्या पितळेच्या वाट्या
रंगबिरंगी जमवलेल्या आता फुटलेल्या काचा
थोडे शंख-शिंपले, थोड्या लगोरीच्या चपऱ्या

कोपऱ्यात जुन्या पुस्तकांची थोडी थप्पी होती
रंगवलेल्या चित्रांची एक वहीही होती
लाकडी डब्यात एका तांब्याची नाणी होती
एक हत्ती, एक घोडा, एक बैलगाडीही होती

सारे किती क्षुल्लक किती स्वस्त होते
चार दोन आण्यांच्या किमतीलाही नव्हते
लाखमोलाचे क्षण परी त्यात होते गुंतलेले
कसे आज सांगू किती निसटले होते

दिवसभर तसाच मी तिथेच रमलेला
स्पर्श होता साऱ्याचा लहानगा झालेला
हाक मारली कुणी तेव्हा भानावर आलेला
आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...

आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...

जन्मी पुढच्या चालू आपण !!!



 फुले पाकळी मन मोहणारी
कोमजली आहे या वसंतात
या जन्माची उजाड़ बाग़
जन्मी पुढच्या फुलवू आपण !!!

आठवून भेट प्रथम आपली
आजुनही होते हृदयात कम्पन
सात पावले या जन्मातली
जन्मी पुढच्या चालू आपण !!!

रंग गुलाल उधळले सारे
रंग विहीन जीवन झाले
या जन्मी न रंग्लो जरी
जन्मी पुढच्या रंगु आपण !!!

भातकुलीचा खेळ हा
मोडला जरी अर्ध्यावर्ती
या जन्मातले राजा राणी
जन्मी पुढच्या होऊ आपण !!!

एकत्र पुन्हा येण्यासाठी
चल आता संपू आपण
नाहीतरी कुठे जगतोए एकटे
जन्मी पुढच्या जगु आपण !!

कधी काळी मी तुझा श्वास होतो..


 मी तुझ्यावर जेव्हा प्रेम करायचो
काय माहित काय मी करायचो...
तुझ्याच स्वप्नात मी जगायचो
आठ्वानित तुझ्या मी मरायचो...

पण आता का असे भासत नाही
तुझ्या नेत्रात हल्ली तो भाव असत नाही...
स्वप्न पड़न्यासाठी झोपायचा प्रयत्न करतोए
झोप तर नाही म्हणुन आठ्वानित नुस्त मरतोए...

काय ग करू मी जगता पुन्हा येत नाही
तुझ्या माझ्या मधे जो बांध तो कळत नाही ...
तू फ़क्त दखावतेस की तुला सुध्हा कळत नाही
जानतेस तू सारं पण मुद्दाम तू वळत नाही ...

प्रेम करत राहलो मी आजवर पाहित
डोळे बंद करून घाव राहलो सहित...
तूच म्हणायचिस प्रेमात जगायचे असते मरायचे नाही
पण जगणारेच घात करतात येथे मरणारे नाहीत ...

मी तर तुझा प्राण होतो
इतका कसा मी खोटा झालोए...
तुट्लेल्या तुझ्या ह्रुदयाचा
चुकीने पडलेला ठोका झालोए ...

कधी काळी मी तुझा ख़ास होतो
का आता परका झालोए...
कधी काळी मी तुझा श्वास होतो
आता मात्र ठसका झालोए...

विराहाच्या या जगात


विराहाच्या या जगात
असच काही होत असते
बाहेर कुणी हसत असते
आत कुणी रडत असते


काटयांनी भरलेल्या वाटेवर
मूकाटयाणे चालTयचे असते
पायाला रुतला जरी कटा
फुलाचा स्पर्श दाखवायचे असते


मग नको असते ति पहाट
नसते आपली ति सायंकाळ
उरतो फ़क्त आपल्या हक्काचा
रक्तबंबाळ करणारा भुतकाळ


पण ते मला मान्य आहे
तो तुझ्या सारखा ह्रदय मोड़त नाही
कितीही वेदना दिल्या तरी
मला एकटे सोडत नाही...


सर्वे ह्रदय तोड़णारे ऐकून घ्या
तुमचाही कधी हाच हाल असंणार आहे
रडाल जेव्हा तुम्ही तेव्हा
आम्ही सर्व हसणार आहे


त्या हसू मागे किती अश्रु आहेत
तेव्हा तुम्हा लोकांना कळणार आहे
याल धावत तुम्ही आमच्या बाहुत
अणि आम्ही मागे वळणार आहे


पण खरं प्रेम करणारे
कधीच असं नाही करू शकत
कितीही स्वतः रडले तरी
त्या डोळ्यात अश्रु नाही बघू शकत


त्या पणावलेल्या डोळ्यांना मग
आपल्या हास्याने सुकवायचं असतं
मन कितीही रक्त रडले तरी
चेहर्यावर हसू उम्लायचं असतं


विराहाच्या या विश्वात
असच सारे जगत असतात
बाहेर कुणी हसत असतात
आत सर्वे रडत असतात ...


आत .....
सर्वे .....रडत असतात

"कदाचित तुला माझी आठवण येईल !


"कदाचित तुला माझी आठवण येईल !"

खिडकीत जेव्हा उभा तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही तिच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

एकट्याने बाईक चालवताना
मंद झुळूक कानाशी खेळेल
स्पीड-ब्रेक जवळ ब्रेक मारताच
कुणी घट्ट बिलगल्याचे जाणवेल
बघ तो स्पर्श आठवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
तिच्या निथळत्या केसांमधून
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल
पावलांना तुझ्या स्पर्श होता,
ती असल्याचा भास होईल
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मी काही जगात पहिला नाही


मी काही जगात पहिला नाही
ज्याच्या प्रियसीच लग्न झालाय
आता दु:ख करण्यात काय अर्थ
ती थोडीच परत येणार आहे
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी माझ्या मनाला समज घातली
पण, थोडा वेळ तर लागणारच
सार काही एका क्षणांत नाही संपत
या सारया लोकांना कोण सांगणार
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी जीवाच बर वाईट नाही करणार
मला पण भरपूर जगायचं
तिने मला प्रेमात नकार दिला म्हणून काय
मला अजून बरच काही बघायचं
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी कधी गप्प गप्प राहतो
याचा अर्थ मी तिचा विचार करतो असा
सारेच मला समजावण्याचा प्रयंत्न करतात
तुला हे वागण शोभत नाही असा म्हणतात
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

बाहेरच्या लोकांच एवढ मनावर घेत नव्हतो
पण, आता घरच्यानिहि सुरवात केली
काय झाल जरा सांगशील का आम्हला
का तिच्यासाठी तू हि अवस्था झाली
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

तिच्याएवढी ती सुंदर नसलीतरी
कोणीतरी नक्कीच असेल माझासाठी
अण, मी पण तिच्याच शोधात आहे
जिच्यासोबत देवाने बांधल्या सातजन्माच्या गाठी
(कारण आठव्या जन्मी फक्त ती हवी)

And that time no more compromise

म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

पण तुझ्यासाठी सखे मी तुझाच त्याग करेन ....


माहित आहे मला,
 माहित आहे मला तुझ विण हे जीवन व्यर्थ ठरेल ,
पण तुझ्या साठी सखे मी तुझाच त्याग करेन....
पण तुझ्या साठी सखे मी तुझाच त्याग करेन....


तू दिलेल्या वचनांपैकी एक वचन होत,तुला सुखी ठेवायच ,
म्हणूनच...........
म्हणूनच धाडस केल सखे तुला नाही विच्यारायच ,


इच्छा नाही.
इच्छा नाही मला डोळ्यात तुझ्या अश्रु पहायची म्हणूनच वेळ आली आज तुझा निरोप घेण्याची ,
मला स्वार्थी म्हणनार्यानी खुशाल स्वार्थी म्हनाव...................
मला स्वार्थी म्हणनार्यानी खुशाल स्वार्थी म्हनाव...................
पण देवारयात देव म्हणुन बसनार्याने एखादा तरी मानुस म्हणुन बघाव ,


मी वेडा आहे ,
हो मी वेडा आहे फ़क्त तुझ्या प्रेमासाठी ,
मला वेडा म्हणनार्यानी खुशाल वेडा म्हनाव ,
पण वेडा म्हनतानाही मझ्यातल शाहाणपण जनाव,


मला माहित आहे तुझी प्रत्येक आठवण मला रडवेल
पण तुझ्यासाठी सखे मी तुझाच त्याग करेन ........

ते एक वडील असतात..


ते एक वडील असतात...
आई प्रेमाची नदी तर, वडील सागर असतात
खारट पाणी असूनसुद्धा ,सर्वाना समावून घेत असतात

घरातल्या सर्वांवर त्यांची, करडी नजर असते
मुले घरी वेळेवर नसली तर, गच्चीतच त्याची मूर्ती उभी असते

पोरांनी खूप मोठे झालेले पाहणे, हे त्याचे स्वप्न असते
त्यासाठी घरदार सोडून पळण, त्याच्या जिवालाच माहिती असते

नसेल प्रेम दाखवत तरी ,आतून वाहता झरा असतात
पोर जेवली का विचारल्याशिवाय ,ते ताटाला हात लावत नसतात

शाळा कॉलेज च्या प्रवेशासाठी, घाम टिपत रांगेत तेच उभ असतात
पैशाची जमवाजमव करत, तुटकी चप्पल पुन्हापुन्हा शिवत असतात

पोरग शाळेत जाऊ लागले कि, त्याला सायकल हवी असते
थोडी वरची पायरी चढल्यावर, त्याला बाइक नवी लागते

वडील आपल अजूनही ,बसच्या मागे पळत असतात
पोर नोकरीला लागल्यावर, आता चार चाकीच घेईन म्हणतात

मुलांची लग्न झाल्यावर, स्वेच्छा निवृत्ती घेईन म्हणतात
मुले नातवंडे परदेशी गेल्यावर रिकाम्या घरात, नोकरीला गेलेलेच बरे म्हणतात

चारचौघात कोडकौतुक करणार, ते एक वडील असतात
आई समईतील ज्योत, तर जळणारी फुलवात वडील असतात

आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा...


चिघळल्या जखमा मनी, स्पर्शू नको,फुंकून जा
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

भावना-संवेदनांचा बांध कोसळला असा,
कोरड्या डोळ्यात माझ्या खार-पाण्याचा ठसा.....
सांत्वनाची चार वाक्ये, खोटीच तू बोलून जा...
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

निखार्यावर चालतांना भाजले हे पाय रे,
पाऊसही तेज़ाब झाला, झेलता मी हाय रे !!
जाळ उरी चेतला, विझवू नको, पाहून जा....
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

कोमेजल्या मनी अजुनी, गंध आहे मोगरा,
करपल्या श्वासात थोडा उरला रे केवडा...
जपले जे तुजसाठी, तुझे तुच घेऊन जा...
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

सरणाची राख झाली, प्रेत नाही संपले,
अंताच्या क्षणात होते, तुजमध्ये गुंतले....
अखेरची आग आता, शेवटी लाऊन जा....
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

मनी तुझ्या काय.


मनी तुझ्या काय..
मनी तुझ्या काय..
मनात तुझ्या काय हे आजपर्यंत नाही उमजल,
खुपदा प्रयत्न करते तुला विसरण्याचा पण बघ ना
मला एवढही नाही जमल,
का बोललास माझ्याशी तू एवढ काही ,
आता या जन्मात तुला विसरण शक्य नाही,
एखाद्या जागेवर असूनही मी मनानी तिथे नसते,
हाथांमधल्या वाकड्यातिकड्या रेषांत मी तुला शोधते,
का भेटलास मला तू जर ,
तुला मला त्रासच देऊन जायचं होत,
का खोट बोलला माझ्याशी,
डोळ्यांत तुला माझ्या आसवच देऊन जायचं होत....