Sunday, June 27, 2010

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची




गजावर झुकलेल्या रातराणीसारखी

नजर तुझी झुकायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!

निंबोणीच्या झाडामागचा

चंद्रही गालात हसायचा

आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा

त्याच्यावर उगी रागवायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!



कळी कळी वेचतांना तू

फुलाच्या कानात बोलायची

मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!

तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे

मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे

भुवई ऊडवत जायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!



असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच

सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच

अन डोळे मोठे करुन पाहायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!



आता मात्र सोसत नाही,

दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही

असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

असंही प्रेम असतं!!!!!

होतं....




काय करु? काहीच सुचतं नव्हतं....



उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....



गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....



थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....



थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...



म्हणजे माझ्याच वयाची असेल!



कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?



आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?



मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...



तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....



मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'



तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'



मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'



तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'



मी चकीत झालो!



विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'



तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

अशी असावी ती

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी


मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी



चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,

चारचौघीत उठून दिसणारी असावी



ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,

माझी एक छानशी चारोळी असावी



यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,

पण घराला घरपण देणारी नाईका असावी



बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,

पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी



हाय... हेलो... नया दौर असला तरी

नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी



ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी

नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी



ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी

तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी



केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी

मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी



थोडी खट्टी...थोडी मिठी असावी

तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी



हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी

त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी



इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी

मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी



चोरून चोरून भेटायला येणारी असावी

हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी



तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी

सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी



जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी

माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी



आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी

भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी



प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी

मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी



तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,

एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

किती छान असतं ना ???

आवडणं...




किती छान असतं ना ?

आपण कुणालातरी आवडणं...



कुणीतरी तासनतास आपलाच विचार

करणं....

खरच !किती छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं...



कुणाच्यातरी पर्सनल डायरित

आपलं नाव असणं ,

चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच

उल्लेख करणं,

किती छान असतं ना ?

आपण कुणालातरी आवडणं...



कुणीतरी आपलं हसणं

काळजात साठवनं ,

कुणालातरी आपला अश्रू

मोत्यासमान वाटणं...

किती छान असतं ना,

आपण कुणालातरी आवडणं....



कुणीतरी आपल्या फोनची

तासनतास वाट पाहणं ,

आपल्याला एकदा ओझार्त

पाहण्यासाठी ,

तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,

देवसमोरही स्वताआधी

आपलं सुख मागणं ,

खरच !किती छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं...



कुणीतरी डोळ्यात जीव आणून

आपली वाट पाहणं ,

आपल्या उपवासा दिवशी

त्यानं ही हटकून उपाशी राहणं,

खरच !किती छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं...



कुणीतरी आपला विचार करत

पापनीवर पापनी अलगत टेकवनं..

झोपल्यावर मात्र

स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....

खरच, खूप छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं

काल रात्रीच्या पावसात.....

पावसात.....




काल रात्रीच्या पावसात.....

एक सर अशी येऊन गेली,

मनातल्या तुझ्या आठवणींना

चीम्ब -चीम्ब करून गेली....





थंड वाऱ्याची झुळूक

अंगाशी झोंबून गेली

त्या वाऱ्यानेही मला

तुझ्याच स्पर्शाची चाहूल दीली...





मग पावसाने आपला जोर कमी केला,

आणी मी त्याच्या सरी झेलण्याचा खेळ सुरु केला

तुझ्या हृदयस्पर्शी आठवणींच्या या पावसात,

जीव कसा बघ न्हावूनी गेला....





असं वाटलं... हा आठवणींचा पाऊस नसून, प्रेमाचा पाऊस असावा

जसा थंड वाऱ्याच्या ऐवजी तुझाच गरम स्पर्श असावा...

मग चीम्ब-चीम्ब व्हायला आठवणींची गरज नाही

आणी साथ तुझी असल्यावर मला काहीच अशक्य नाही....

भिजलेला पाउस...

Paaus...पाउस ...

Friday, June 25, 2010

§§ थंडीच्या या रात्रीमध्ये…. §§

या थंडीच्या रात्रींमध्ये,

तुझी खूप आठवण येते.

तुझ्यावरचं माझं प्रेम,

पुऩ्हा पुऩ्हा जागं करते



तुझ्या भेटीची आतुरता,

मनामध्ये काहूर माजवते

वाटतं ही थंडीची लाट,

माझ्या एकटेपणांस खिजवते.



हवीहवीशी तुझ्या मिठीतली उब,

या रजईत कशी येणार?

स्वर्गातल्या त्या अमृताची सर,

इथल्या मधात कशी जाणवणारं?



तरीसुद्धा या गुलाबी थंडीत,

मी, “ही” एकटी रात्र जागतो आहे.

तुझ्या भेटीसाठी येणारा,

प्रत्येक क्षण मोजतो आहे…..

§§ वृक्ष माझा कोरडा... §§

वृक्ष माझा कोरडा असला तरी,

जगण्याची उमेद संपलेली नाही.

वादळ-वारा पावसांतदेखील,

त्यानं आपली जागा सोडलेली नाही.



येणाऱ्या ‌ऋतुमध्ये तो बहरणांर,

याची त्याला खात्री आहे.

फुलांशी आणि फुलपाखरांशी तर,

त्याची खूप जूनी मैत्री आहे.



वर्षा राणीने घात केला म्हणून काय झाले,

श्रावणधारा तरी नक्कीच येतील.

जगण्याच्या या उमेदीला,

नवीन आयुष्य देउन जातील.



प्रतिक्षा आहे थोड्या दिवसांची,

मग बघ “तो” पुऩ्हा बहरेल.

काळजावर स्वतःच्या दगड ठेवून,

तो मागच्या आठवणी विसरेल.

§§ वाट पाहतो तुझी मी…§§

किती दिवस वाट पाहतोय,

आता तरी येशील का?

डोळे आहेत तुझ्या वाटेवर,

त्यांचे पारणे फ़ेडशील का?



ते दिवसही गेले,

वेळही “ती” निघून गेली.

तरीसुध्दा तुझ्या मनात,

माझ्यासाठी जागा नाही का झाली?



तू येशील, मला भेटशील,

एवढाच विचार मनात आहे.

तुझ्या माझ्या आयुष्याची,

स्वप्नं मी रंगवतो आहे.



पण चांदण्यांची शोभा ही,

त्या चंद्राच्या येण्यानेच आहे

तशीच माझी ही स्वप्नांची दुनिया

तुझ्याशिवाय अपूर्ण आहे.



म्हणून जरा विचार कर,

माझ्या या वेड्या मनाचा.

वाटलच तुला जर काही,

तर निश्चय कर भेटण्याचा…..

§§ तुझ्यशिवाय माझं जीवनं….§§

तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात,

काहीसुध्दा उरलं नाही.

हे असं का झालं,

ते मलासुध्दा कळलं नाही.



रोज समोर येउनसुध्दा,

कधीतरी पाहतेस.

तुझ्या “त्या” नजरेने,

मन माझं जिंकून जातेस.



मी काय करतो, कसा वागतो,

ते मलासुध्दा कळत नाही.

असं वाटतं तुझ्याशिवाय

मला काहीच अर्थ उरत नाही.



कितीही झालं, काहीही झालं,

तरी मलासुध्दा मनं आहे.

फ़ार मोठं नसलं तरी,

त्यातसुध्दा “प्रेम” आहे.



तू “हो” म्हण किंवा “नाही”,

शेवटपर्यंत तुझीच प्रतीक्षा आहे.

या नाहीतर पुढच्या जन्मी,

तुझ्या प्रेमाची अपेक्षा आहे.

§§ तू राजकुमारी…§§

आहेस तू एक राजकुमारी,

जशी एखादी स्वप्नपरी.

दिसणं तुझं मी कसं सांगणार?

सौंदर्य तुझं शब्दातं कसं बांधणार?



हरणालाही लाजवतील,

असे डोळे आहेत तुझे.

गुलाबाच्या पाकळ्यांसारखे,

कोमल ओठ आहेत तुझे.



वाटतं तुझ्या या मोकळ्या केसांत,

वारा बनून फिरावं.

हळूच कानाजवळ जाऊन,

मनातलं गुपित तुला सांगावं.



पण हा तर माझ्या मनाचा खेळ आहे,

तुझ्याच हातात आपला मेळ आहे.

ठरव आता तूच…

मला असा एकटाच सोडणार…

की आयुष्यभर माझी साथ देणार?

§§ प्रेम करतो मी, पण…§§

प्रेम करत असुनसुध्दा,

काहीच सांगू शकत नाही.

माझ्या मनाची व्यथा,

तुझ्यासमोर मांडू शकत नाही



कधीकधी नशीबसुध्दा,

विचित्र खेळ खेळतं.

जायचं नसत ज्या वाटेला,

तिच वाट पक्की करतं.



नाही म्हणालो मी तरी,

आता मनावर ताबा नाही.

रमवलं दुसरीकडे त्याला तरी,

आठवण काढल्याशिवाय रहात नाही.



मी प्रेम केलं हे नक्की

पण मी आता बोलू शकत नाही.

खुलली नाही जर तुझ्या ओठांची कळी,

तर फूल आपल्या स्वप्नांचे

कधीच फुलणार नाही

§§ प्रेम….§§

ध्यानी मनी काही नसताना,

ह्रदयात कहीतरी होतं.

सगळं काही सुरु असताना,

मनं मात्रं दूसरीकडेच असतं….



सारखं वाटत असतं,

जाऊन तिला पहावं.

मनात एक वेडी आशा…..

तिनेही इकडेच बघावं



मनाच्या या गोंधळात वाटतं,

एकदातरी तिच्याशी बोलावं.

मनातल्या प्रेमाच्या घरात,

तिला हळूचं बोलवावं.



पण, पुऩ्हा मनात वाटतं,

थोडी वाट पहावं.

…..असं हे प्रेम असतं,

जे प्रत्येकाने अनुभवावं

§§ पाहिलं तुला मी….§§

पाहिलं तूला तेव्हा वाटलं नाही,

मी तुझ्यावर कधी प्रेम करेन.

“त्या” प्रेमापासून दूर असणारा मी,

तुझ्यामुळे स्वतःलासुध्दा विसरेन !!



ओळख झाली मैत्री झाली,

गाठभेट आपली रोजचीच झाली.

या वाढत्या सहवासामुळे,

तुझी आयुष्यात गरज निर्माण झाली !



दिसली नाहीस एक दिवस,

की मला काहीच सुचत नाही.

तुझ्याशिवाय या मनात,

दूसरा विचारच येत नाही.



प्रेम करत असलो तरी,

शब्द माझे अबोल आहेत.

समजशील तू मला म्हणून,

तुझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.

§§ मी आणि माझं मन..... §§

बंदिस्त झालय हे मन आजकाल,

जगण्याचा विचारच करत नाही

लाख प्रयत़्न केला याला समजावन्याचा,

पण तिला विसरायला, तयारच होत नाही



मी म्हणालो या मनाला,

काळ हाच या जखमेवरचं औषध आहे

मन उत्तरतं……

या काळाच्या प्रत्येक क्षणामध्ये,

फ़क्त आणि फ़क्त तिचिच तर आठवण आहे.



मग मीही म्हणतो रागाने त्याला,

विसरून जा जे झालं, तो एक भूतकाळ होता,

सर्वस्व विसरुन प्रेम केलस म्हणून काय झालं,

तो प्रवास तर इथपर्यंतच होता….



यावर मात्र हसतं “ते” मनं आणि सांगतं………

अरे प्रेमाला काळात बांधून विसरून जाणं कसं शक़्य आहे?

या काळातच तर माझं जगणं होतं…

हा प्रवास तु सुरू केलास म्हणून काय झालं,

याचा शेवट करणं तुझ्या-माझ्या हातातं नसतं…



असंच मी रोज या मनाशी भांडत बसतो,

समजुतीचे चार शब्द ऎकवत राहतो,

तिला तर मीच हरवून बसलोय,

पण या मनाबरोबर भांडून का होईना,

मीही तिच्याच आठवणीत जगत असतो……



तिच्याच आठवणीत जगत असतो…………

§§ कसं विसरू तुला…§§

असं काय कारण आहे,

की मी तुला विसरूच शकत नाही.

तुझ्यातच गुंतलय हे मन,

दूसरा विचारच करत नाही.



तूच माझी शेवटची इच्छा,

तूच आहेस माझं जीवन.

तुझ्याशिवाय या जगात,

एकटंच भटकतयं हे मन.



वाट तूझी पाहून पाहून,

श्वास माझे थकले आहेत.

“तू” येशील याच आशेवर,

डोळे लावुन बसले आहेत.



आता माझ्या आयुष्यात,

जगणं कमीच उरलं आहे.

वृक्ष तर कधीच कोरडा झाला,

आता मुळंसुध्दा वठली आहेत.

§§ काय माहित तुला.. §§

कसं समजावू तुला,

किती प्रेम करतो मी?

कसं सांगू तुला,

तुझ्यावर किती मरतो मी?



तू माझ्याजवळ नसतेस,

तेव्हा एकटाच बडबडतो मी.

आरशासमोर उभा राहून,

स्वतःशीच बोलत राहतो मी.



कधी वाटतं तुझ्याशी खूप बोलावं,

कधी वाटतं तुला पाहताना तुझ्यातच रमावं,

कधी वाटतं तुझं बोलणं ऎकतच रहावं,

माझा विचार तरी आहे का तुझ्या मनात,

हे तुझ्या बोलण्यातून मला कळावं.



तू काहीच बोलली नाहीस,

की मन माझं नाराज होतं.

समजशील तू माझ्या प्रेमाला

एवढीच अपेक्षा ते करतं


जगाची बंधनं ही तर सर्वांवर आहेत,

पण त्यातुनही मला तुझ्या प्रेमाचा आधार दे,

नाहीतर या जगाचा विचारच सोडून दे

कारण तुझी आतुरतेनं वाट पाहतोय मी,

आता तरी कळेल का तुला,

तुझ्यावर किती प्रेम करतो मी?

§§ कदर माझ्या प्रेमाची… §§

थोडी होतीस तू माझी,
थोडा होतो मी तुझा.

पण प्रेम केले फक़्त मी,

हाच दोष होता माझा.



प्रेम तर सगलेच करतात,

मीही तुझ्यावर केलं.

काहीजण न सांगताच समजतांत,

पण तुला मी सांगूनही नाही कळालं..



वाट तुझी पाहताना,

जीव माझा झुरत होता.

येणऱ्या प्रत्येक नकारावेळी,

तीळ-तीळ तुटत होता.



मलाही कळून चुकलयं आता,

तू माझी होणार नाहीस.

कारण तुझं मन बदलणं,

आता माझ्या हातांत राहीलं नाही.



पण तू माझी झाली नाहीस,

म्हणून माझं जीवन संपणार नाही.

कदर नसली तुला जरी माझी तरी,

मी तुला कधीच विसरणार नाही.

§§ ही संध्याकाळ….§§

सुंदर आहे ही संध्याकाळ,

मोहक आहेत आकाशाचे रंग.

परतंत आहेत घरट्याकडे पक्षी,

सजवले त्यांनी सुर्यप्रतिबिंब.



सुर्याचा हा अस्त, ही कातरवेळ,

नभामध्ये सुरू आहे, ढगांचा खेळ.

मंद आहे वारा, पसरला आहे सुवास,

मनाला हवा आहे, कोणाचा तरी सहवास.



हा अस्ताला जणारा सूर्य,

काय बरे सुचवत आहे ??

…बहूतेक…..तो माझ्या…

एकटेपणास खिजवत आहे…



पण त्याचाच हा नियमं आहे,

आज जो मावळला, तो उद्या उगवणारं,

तसाच माझा हा एकटेपणा,

या वेळेबरोबर संपणार….



--- तुषार

§§ ही वेळ सुर्यास्ताची.. §§

ही वेळ आहे सूर्यास्ताची,

ही वेळ, तुझ्या माझ्या आठवणींची.



ह्या वेळी, वाऱ्याची मंद झुळूक,

माझ्याभोवती फिरत राहते.

हळूच मला कवटाळून,

तुझ्या स्पर्शाची जाणीव देते….

……अशी ही वेळ संध्याकाळची,

आठवण आपल्या भेटींची….



या भेटींमुळेच आपण,

दिवसेंदिवस जवळ आलो.

थोडा मी……थोडी तू

एकमेकांत गुंतत गेलो



पण…

मनातली गोष्ट ऒठांवर येणे,

हे दोघांसाठीही गरजेचे आहे.

आणि त्यासाठी अजुन एक संध्याकाळ,

तेवढीच गरजेची आहे…

वाट पाहेन मी.… “त्या” भेटीची,

वाट पाहेन…..त्या सर्वात सुंदर सुर्यास्ताची.



--- तुषार.

§§ हवी आहेस तू…..§§

हवे आहेत डोळे तुझे,

माझी स्वप्न पाहण्यासाठी…

हवे आहेत हात तुझे,

माझ्या आयुष्यरेखा उमट्ण्यासाठी…

हवं आहे हसणं तुझं,

या जीवनाच्या ताजेपणासाठी….

हवं आहे रुसणं तुझं,

थोड्या-फार चेष्टेसाठी…..

हवी आहे हाक तुझी

सोडून सगळं परत येण्यासाठी

हवी आहे मिठी तुझी,

या जगाचा विसर पडण्यासाठी…

………….

…………………….

अशा किती गोष्टी सांगू तुझ्या,

ज्या हव्या आहेत मला जगण्यासाठी..

तु कितीही, काहीही म्हण,

पण जगतोय मी तुझ्यासाठीच…

§§ हा दूरावा…. §§

काय बोलू कसे बोलू,

शब्द माझे अबोल झाले

तुझ्याविना असे एकटे,

जगणेच मला अशक़्य झाले.



जवल आहेत आपल्या आठवणी,

आठवतो आहे तुझा सहवास.

तुच आहेस ध्यानी-मनी,

ह्रदयात फ़क़्त तुझाच निवास.



तुझ्यासाठी जगतो आहे,

तुझ्यासाठीच जगणार आहे.

आपल्या भेटीसाठी येणारा,

प्रत्येक क्षण मोजणार आहे..



तरीही “हा दूरावा”

आपल्यामध्ये राहणार आहे.

कधी तुला तर कधी मला,

रोज रोज सतावणार आहे.

§§ दुबळी ही जीवनगाडी….§§

व्यर्थही नव्हते विचार माझे,

अर्थही होता वचनांना पण,

आज व्यर्थही नाही,अर्थही नाही,

दूबळी ही जीवनगाडी, आज पुढे का सरकेना?



स्वप्नही एक पाहीले होते,

रंग तिने त्यातब भरले होते.

आज स्वप्नही नाही, ‘ति’ पण नाही,

रात्र पसरली भोवती पण, झोप मला का येईना??



एक प्रश्न होते आयुष्य माझे,

त्याचे उत्तर ती बनून आली.

आज परत तिथेच उभा मी,

तेच प्रश्न घेउन पण, उत्तर का मज सापडेना??



गंध होता तिच्यासव जगण्याला,

फुले अगणिक बहरली होती.

आज शोधितो मी तोच गंध,

आठवितो त्या फुलांना पण,

कोमेजलेले जीवनफुल माझे,

काही केल्या उमलेना…..

दुबळी ही जीवनगाडी, आज पुढे का सरकेना???

§§ दूर राहूनही प्रेम कसं करायचं….§§

दूर राहूनही प्रेम कसं करायचं,

हे कधीतरी विचार मला.

नजरेसमोर नसूनही का जवळ असतेस माझ्या,

हे कधीतरी विचार माझ्या मनाला.



सोबत नेहमी असतात आपल्या आठवणी,

आणि फक्त त्यावरच मी जगतो.

आठवतो तुझं बोलणं, हसणं…ते जवळ घेणं,

आणि त्या सुंदर क्षणांमध्ये मी स्वतःला रमवतो.



आत्ता तू जवळ नाहीस म्हणून काय झालं,

आयुष्यभर तर तू जवळच राहणार आहेस.

अगं जीवसाथी म्हणून निवडलयं तुला,

तू तर माझी बायकॊ म्हणून मिरवणार आहेस !!



म्हणूनच सांगतोय अगं वेडे,

सांभाळ जरा तुझ्या मनाला.

तिकडे उदास असतेस तू,

पण ऒढ लागते या जीवाला.



वचन आहे माझं,

एक दिवस असा असेल.

रंग माझ्या प्रेमाचा,

तुझ्या हातावरच्या मेहंदीत असेल



आयुष्यभरासाठी जवळ असशील तू

आणि या विरहाच्या आठवणींमध्येच,

आपल्या दोघांचा संसार सामावेल.

$$ आयुष्य तुझ्यविना……… $$

वाट चुकलेले हे आयुष्य असे,

अंधारात चुकलेले जहाज जसे.

मनाला या विचारांचा अंत नसे

न उमलताच कोमेजलेले सुमन जसे.



का जाहला हा कोप मनावर,

का जाहले ते निश्चय हतबल.

प्रश्नांचे या शोधिता उत्तर,

चुक बरोबर काहिच नसे.



दिली होति वचने कोणितरी,

घेतल्या होत्तत्या शपथा कोठेतरी.

येता आठवण आज त्या दिसांची,

आयुष्याचा य अर्थच नसे.



असेल उद्या रास सुखांची,

रंगेल उद्या मैफ़ील स्वरांची

पण नसताना तू संग सखे,

त्या स्वरसुखाना गंध नसे

आठवण तुझी येते तेव्हा,

आठवण तुझी येते तेव्हा,


मी स्वतःलाच हरवून बसतो.

विचार तुझा करता करता,

साऱ्या जगाला विसरून जातो.



आठवण तुझी येते तेव्हा,

मनं माझं, मला जाब विचारतं

माझी असूनही तू मझ्यापासून दूर का?

याचचं कारण ते मागतं.



आठवण तुझी येते तेव्हा,

डोळ्यातं थोडसं पाणी येतं.

हातावर दोन थेंब जरी पडले,

तरी त्यात तुलाच दाखवतं.



आठवण तुझी येते तेव्हा,

मन माझं अस्वस्थ होतं.

आठवण तुझी येते तेव्हा,

वाटतं हे जग सोडून द्यावं,

आणि तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा,

मी मरणाला जवळ करावं……