Wednesday, April 28, 2010

Speech by Chetan Bhagat at Symbiosis........

Speech by Chetan Bhagat at Symbiosis ...

Don't just have career or academic goals. Set goals to give you a balanced, successful life. I use the word balanced before successful. Balanced means ensuring your health, relationships, mental peace are all in good order.
There is no point of getting a promotion on the day of your breakup. There is no fun in driving a car if your back hurts. Shopping is not enjoyable if your mind is full of tensions.
"Life is one of those races in nursery school where you have to run with a marble in a spoon kept in your mouth. If the marble falls, there is no point coming first. Same is with life where health and relationships are the marble. Your striving is only worth it if there is harmony in your life. Else, you may achieve the success, but this spark, this feeling of being excited and alive, will start to die.
One thing about nurturing the spark - don't take life seriously. Life is not meant to be taken seriously, as we are really temporary here. We are like a pre-paid card with limited validity. If we are lucky, we may last another 50 years. And 50 years is just 2,500 weekends. Do we really need to get so worked up?
It's ok, bunk a few classes, scoring low in couple of papers, goof up a few interviews, take leave from work, fall in love, little fights with your spouse. We are people, not programmed devices.

"Don't be serious, be sincere."!

Tuesday, April 20, 2010

ती दिसली.....

ती दिसली.....


 ती दिसली.....



भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले

तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....



तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो

नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....



तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या

सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....



खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले

मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....



म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव

तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....



तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली

एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....



कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून

बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....



इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत

अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....



नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची

रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

Saturday, April 17, 2010

तुझी भेट होते तेव्हा

तुझी भेट होते तेव्हा


 तुझी भेट होते तेव्हा, माझा मीच नसतो,

तुझ्यातच गुंततो इतुका कि, इतरांत कमीच असतो.



तू चुकतेस वाट, मिलनाची कधी कधी,

पण त्या वाटेवरती, मी नेहमीच असतो.



विचार असतात मनात, केवळ तुझेच दाटलेले,

ते नसतात तेव्हा बहुदा, मी रिकामीच असतो.



तू असताना वर्तनुकीचीही, पायरी ठरलेलीच असते,

तुझ्या उपरोक्षही मनातला, भाव संयमीच असतो.



तुझे सुख वेचताना कधी, काटा भासतो मीच स्वताला,

असावे कि नसावे जीवनी तुझ्या, मी या संभ्रमीच असतो

Friday, April 9, 2010

बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून

बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून






बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,

वेळच गेली निघून ............ ......... ..



प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.

जरी नजरेतून समजत असले तरी

ते शब्दातून सांगावच लागत.

बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,

वेळच गेली निघून ............ ......... ..



जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे

मनाला जनवल तेव्हा हे हसणार मन

दू:खात बुडून गेल .

पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.

बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,

वेळच गेली निघून ............ ......... ..



दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू

पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत

कदाचित दोघानाही सांगायचे होते काही

बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,

वेळच गेली निघून ............ ......... ..



जे जमले नाही मला या जन्मी

कदाचित मिलविन मी तुला पुढच्या

जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या

जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला

खुप खुप आवडतेस मला ,

बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,

वेळच गेली निघून ............ ......... ..

आयुष्य हे असंच असतं...???

आयुष्य हे असंच असतं...???



आयुष्य हे असंच असतं...???

कधी कधी खुप आनन्द देतं

न मागताही सुख देतं,

पण अच्यानक हासता हासता रडवतं

आयुष्य...हे असंच असतं.????



आपण बरंच काही ठरवतो

आयुष्याचे आराखडे बांधतो

पण एका वळणांवर सगळ काही थांबतं

आयुष्य...हे असंच असतं.????



भुतकाळातल्या गोड आठवणी

वेड मन आठवत रहातं

पण त्या मनाला फ़सवुन रडवतं

आयुष्य...हे असंच असतं.????



सुखाबरोंबरच दु:खहीं देतं

कधीही भरुन न येणां-या

भळभळणां-या जखमाहीं देतं

आयुष्य...हे असंच असतं.????



आयुष्यात खुप काही मिळतं

त्यातल बरंच काही नको असतं

पण जे हवं असतं तेच मिळत नसतं

आयुष्य...हे असंच असतं.????