Monday, February 22, 2010

TO ANI TI....

मनाला आपणच आवरायचं असतं..

मनाला आपणच आवरायचं असतं..
गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं...
मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं...

ती समोर असली की..

ती समोर असली की..






ती समोर असली की..



ती समोर असली की

शब्द पाठमोरे होतात

सांगायचे खुप असले तरी

शब्दच दिसेनासे होतात



पण आज मी ठरवले होते

तिला सर्व काही सांगायचेच

वेडया ह्या माझ्या मनाला

तिच्यासमोर मांडायचेचं



हसु नको पण मी

आरशासमोर राहुन तयारी ही केली होती

सुरुवात नि शेवट ची

पुन्हा पुन्हा उजळणी केली होती



सगळं काही आठवत असुन ही

मी गप्पच होतो

तिच्या हालवण्याने

भानावर आलो होतो



ती माझ्याकडे बघत राहिली

न मी तिच्यात हरवलो

खोटं नाही बोलणार मी

पण पुन्हा सर्व विसरलो



ती च मग बोलली

निरव शांतता मोडत

तुझ्या मनात काय आहे

मला नाही का ते कळत..



तुझ्यात मनातलं मी

कधीच वाचलं होतं

माझं मन ही नकळत

तुझं झालं होतं



आता मात्र मी

घेतला तिचा हाती हात

आयुष्याभरासाठी द्यायची

ठरवली एकमेकांना साथ



आता मात्र मला

सर्व काही आठवले

ती समोर असली तरी

आपसुकच सुचत गेले

एकदा का होइना प्रेम करून बघ..

एकदा का होइना प्रेम करून बघ..



आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..

खुप वेळ असेल तुझ्याकडे..

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..

कविता नुसत्याच नाही सुचणार…

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..

खुप छान वाटत रे..





सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…

नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..

ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..

नुसतच काय जगायच..

जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..

एक जखम स्वतः करून बघ..





स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ...

नुसत सुखच काय अनुभवायचे..

दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..

विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..

थोड्या जखमा स्वतः करून बघ..

रिकाम काय चालायच..?





आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..

रडत असलेले डोळे लपवत..

एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..

सोपं नसत रे…एकदा रडून बघ..

तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..

सांगण्याचा हेतु एवढाच की..

एकदा का होइना प्रेम करून बघ..

तु निघुन गेलीस.......

तु निघुन गेलीस.......

तु निघुन गेलीस

कळलेच नाही जाताना

जगच बदलेल माझे

कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........

रडू नकोस

उगीच चांगले नाही ते जाताना

माझे रडणे राहूनच गेले

तुला सगळे समजावताना................

आभाळं भरले आहे

अगदी जसे होते तु जाताना

पण

आता तेही बरसत नाही

उगीचच कारण नसताना....................

अजूनही जातो त्याच बागेत

रातराणी फ़ुलताना पण मला फ़क्त दिसते

सकाळी ती कोमेजताना...................

झालेच नाही आपले बोलणे

सगळा एकान्त असताना

आज सगळं सुचत जातय

एकटा कविता करताना................

माहीत नाही पुन्हा कधी भेटु

वेगळ्या

रस्त्यावर चलताना अन जुळतील का आपल्या तारा

वेगळ्या जगात राहताना..............

विषय शोधावे लागतील आता

संभाषण चालु असताना

सगळे तसेच राहील

का गं पुन्हा एकत्र असताना.....................

शुन्यच आहे आयुष्य माझे

उणे तु असताना

धरलास का हात सांग तु

सोडुनच जायचे असताना...............

सोन्यासारखा

संसार करशील

दिल्या घरी नांदताना

सांग माझी आठवण येइल का तुला

ती बागेतली रातराणी फ़ुलताना..........

कॉलेज लाइफ़ "

कॉलेज लाइफ़ "




कँटीन मधला चहा आणि

चहा सोबत वडा पाव

पैसे कुठ्ले खिशात तेव्हा

उधारीचचं खातं राव !



कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून

आणि पोरींची चेष्टा करणं

दिसलीच एखादी चांगली तर

तिला लांबूनच बघून झुरणं !



बसलोच चुकून लेक्चरला तर

शेवटचा बाक ठरलेला

कुणाच्या तरी वहीतलं पानं

आणि पेन सुध्दा चोरलेला !



परिक्षा जवळ आली

कि मात्र रात्री जागायच्या

डोळ्यात स्वप्नं उद्याची

म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !



पूर्ण व्हायचं एक वर्तुळ

एक वर्ष सरायचं

पुन्हा नव्या पाखरांसोबत

जुनं झाड भरायचं.



अशी वर्तुळ भरता भरता कळलं

अरे कागदच भरला !

वर्तुळ झाल्या कागदाला

फ़क्त सलाम करायचा उरला !!



पुन्हा नविन रस्ता

पुन्हा नविन साथी

जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या

फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

एक कारण तरी सांगून जा

एक कारण तरी सांगून जा

कोठे निघालिस ? का निघालिस ?

एक कारण तरी सांगून जा

नाही आडवणार तुला

पण संपताना मला पाहून जा

मुक्त व्हायचे होते ना तुला

मला तर पहिले सोडवून जा

नाही आडवणार तुला

पण दोन आश्रू ढाळून जा आहे

तुज्या साठीच प्रा थ ना केल्यात सार्‍या

एकदा त्याना बघून जा

काहीच नको मला आता सारे काही घेऊन जा

एक मृतदेह पाहिला

एक मृतदेह पाहिला


आज एक मृतदेह पाहिला

मन एकदम दाटून आलं

ते शारीर जरी मृत असला

तरी खुप काही सांगुन गेलं



त्या मृत्देहानेही कधी बालपन अनुभवले असेल

तोही कधी शाळेत गेला असेल

मित्रांच्या सोबत तोही कधी खेळला असेल

खेळता खेळता तोही कधी रडला असेल



त्या मृत्देहानेहीे कधी तारुण्य अनुभवले असेल

तोही कधी कुणाच्या प्रेमात पडला असेल

प्रेमाचा विरह त्याने ही भोगला असेल

हळूच कधी एकांतात तोही रडला असेल



त्या मृत्देहानेही कधी संसार थाटला असेल

तोही कधी कुणाचा बाबा झाला असेल

मुलांसाठी त्याने खुप काही केला असेल

तीच मूलं दूर गेल्यावर तोही रडला असेल



मी ही क्षणभर थाम्बुन विचारल स्वतःला

माझे ही आयुष्य काही वेगळं जाणार आहे ?

मी ही त्या प्रवासाच्या वाटेवर आहे

आणि माझा ही प्रवास असाच थांबणार आहे .

वाटलं होतं ही त्याची शेवटची भेट असेल

पण नंतर उमगले मी किती चुकीचे आहे

आणि माझी अन् त्या मृत्देहाची

एके दिव्शि नक्कीच भेट होणार आहे

तर ते आहे प्रेम....!

तर ते आहे प्रेम....!


हे प्रेम आहे

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,

तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,

तर हे प्रेम नाही ही तर वासना....!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,

तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,

तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!



जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,

तर ते आहे प्रेम....!



जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,

तर ते आहे प्रेम....!



जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,

तर ते आहे प्रेम....!



जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता

पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही

आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,

तर ते आहे प्रेम ....!

फकत एकदा म्हण मी तुझाच आहे ग

फकत एकदा म्हण मी तुझाच आहे ग


तु विसर मला कायमच.......

पण-

"मी तुला विसरलो"

अस कधीही म्हणु नकोस...

तु कधीच वाचु नकोस

माझी कुठलीही कविता

पण म्हण-

मी वाचेन तुझी कविता कधीतरी...

तु कधीच स्वीकारु नकोस

माझ्या या खऱ्याखुऱ्या प्रेमाला

पण.. "तुझं प्रेम खर आहे ग"

तु कधीच देऊ नकोस

मला फ़ुलांचा गुछ

पण- एखादं गुलाबाचं फुल तरी

ठेवुन जा रे या माझ्या हातावर.....

तु कधी लक्षही देवु नकोस

मला होणाऱ्या यातनांकडे...

तु कधी रडुही नकोस

माझ्यासाठी.......

पण जाता जाता

अंत्यदर्शनाला ठेवलेल्या त्या माझ्या प्रेताला

एकदा , फक्त्त एकदा घट्ट कवटाळ

आणि म्हण-

या जन्मात नाही

पण पुढच्या जन्मात का होईना



मी तुझाच आहे ग!!!!

मी तुझाच आहे ग!!!!

मध्यमवर्गीय मुलीच जीण...

मध्यमवर्गीय मुलीच जीण...


कस हे जीण आलय माझ्या वाट्याला

sophistication च्या मुखवाटयाखाली लागतय वावरायला...



मोकळीक तर सगळी आहे पण ती फक्त बोलायला

आड़ येते प्रतिष्ठा गेल की काही करून दाखवायला....



समाजात वावरताना स्वताला forward समजत राहायच

संस्काराच्या ओझ्याखाली आपल्या आशा आकांक्षाना दडपत राहायच...



नेहमी मान सन्मान, इज्जत प्रतिष्ठा या सगळ्यासाठी लढत राहायच

मग मला सांगा ना स्वतःसाठी दोन क्षण कधी जगायच...??



काय सांगू आई बाबा कित्ती कित्ती गमावलय

या अदृश्य बेड्यापायी तुमच्या मुलीने स्वतःच्या प्रेमाला बळी चढ़वलय...



पण आता मला कळलय स्वप्नापेक्षा वास्तव खुप वेगळ असत

म्हणुनच....

आता मला स्वतःला बदलायचय...

या स्वप्नवेडीला आता सत्यात जगायला शिकायचय....

Tuesday, February 9, 2010

मैत्रीचे क्षण.........

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात ....

Saturday, February 6, 2010

अश्रु . . . !!!

अश्रु . . . !!!
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

आई खरच बोलायची

आई खरच बोलायची
आई खरच बोलायची ,
लहानपणी निम्बोनिच्यामागे मामा रहायचा चंद्राच्या दारी,

दिवस तेहि भलेच होते,जेव्हा पाठीवर दप्तराचे ओझे होते,
ते ओझे मनावरच्या ओझ्यापेक्षा हलकेच का नव्हते ?

त्या कमकुवत फांद्या झाडांच्या,ज्या आम्ही लीलया सर करायचो,
आणि आत्ता उंच-उंच  इमारती ज्यांची मजले रोज चडूनही स्वतःचेच घर विसरायचो ,

ते शर्ट ज्याचा रंग मैदानाच्या   माती समान असायचा,
आणि आता हा  अवघडायला  लावणारा उच्चभ्रू पेहराव, 

त्या रात्री जेव्हा थकून बिछान्यावर आजीच्या गोधडीवर गाढ झोपी जायचो,
आणि आता आईच्या अंगाईच्या  आठवणीने रात्रभर रडायचो,

आई खरच बोलायची,
जेव्हा कॉलेजला   जाताना ती वाटखर्ची द्यायची, 
जपून वापर,नीट रस्ता ओलांड,अभ्यासासोबत मजाही कर....उद्या हे सर्व जवळ नसेलही
आई खरच बोलायची....

कधी आयुष्यात आलीस

कधी आयुष्यात आलीस
कधी आयुष्यात आलीस  अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता .. अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..

कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी.. तुझ्या प्रेमळ मिठी साठी..

पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...
शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!

आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?

कदाचित हो असेल तुझ उत्तर...
 पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो..

होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं जर तेव्हाच मनच तर..
 पण वेळ गेल्यावर काय करणार..
त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य नाही होणार..!!

आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट होईलही ..
पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि
कि
कि
 तू खुश तर आहेस ना!!

Friday, February 5, 2010

कधी तू परत येशील?

कधी तू परत येशील?
खूप दिवसांनी ती मला भेटली
काही न विचारता अगदी मुदयावर आली
तिच्या शब्दांनी तन सुन्न झाले
ते ऐकून डोळे अगदी भरून आले

"विसरून जा मला" अस ती म्हणाली
पुन्हा न भेटण्याची ताकीद तिने मला दिली
काही न बोलता मी खाली मान टाकून उभा होतो
डोळ्यात येणार्‍या त्या थेंबांना मी अडवत होतो

ती निघून गेली
तिच्या पलटण्याची वाट पहिली
ती परत येईल, ती मला समजून घेईल
पण ती वाट फक्त एक आसच राहिली

तिच्या सुखाताच माझ सुख बघितल
तिच्या दु:खातच माझ दु:ख पाहील
अस कधी ती करेल वाटल नव्हत
कारण तिच माझयावर खूप प्रेम होत

माहीत नाही काय कारण आहे
ती मझयशी दूर जात आहे
कधी तरी तु माझया भावना समजशील
मझयासाठी कधी तू परत येशील?

फक्त मैत्रिण

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?


आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?


तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!



माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?


''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ

'नक्की कोण तू माझा

'नक्की कोण तू माझा' - 
'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,
निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,
प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,
नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,
माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,
आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,
तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,
म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,
दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,
उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,
धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,
माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,
'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले

तू विसरु शकणार नाही

तू विसरु शकणार नाही




तू विसरु शकणार नाही

नदीचा काठ चमचमत पात्र ,
उतरता घाट मोहरती गात्र .

तू विसरु शकणार नाही

कलंडता सूर्य लवंगति सांज
पक्षांच्या माला कुमकुमती झांज

तू विसरु शकणार नाही

सोनेरी उन वार्याची धुन ,
पावलांची चाहुल ओलखिची खून .

तू विसरु शकणार नाही

दिलेला शब्द ओझरता स्पर्श ,
दड्लेल प्रेम ओसरता हर्ष .

तू विसरु शकणार नाही

हातात हात आणि तुझ माझ हितगुज ,
आंब्याच्या झाडावर चिमन्याची कुजबुज .

तू विसरु शकणार नाही

भिजलेले डोळे विरलेले स्वप्न
भिजलेली वाट उरलेले प्रश्न

तू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही

अस नात आपल हव.....

अस नात आपल हव.....
नसावे नाव,कोणते ते गाव,
ना तुला ठाव,ना मला ठाव.
पण अश्याच, नाव नसलेल्या गावी,
मन का हुन्दडत राही? 
दोनच मन,त्यात दोघेच जन,
मग कशाला त्यात आणखी कोणी हव?
अस नात आपल हव,
अस नात आपल हव....

जरी दोन काया,पण एकाच माया,
दोघानशिवाय नको तीसर कोणी पहाया,
एकच रस्ता आणि  तेवडेच अंतर,
एकत्र चालताना नकोच संपाया नंतर,
नको अडथळे ,आणि जर ठेचालाळच तर,
एकाच्या जखामेची दुसऱ्याच्या यावी कळ,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

दोघांच्या डोळ्यानी एकच जग पहाव सुंदर,
डोक्यावरही दोघांच्या एकच अंबर,
एकाच दुःख दुसऱ्याच्या डोळ्यातील दंव,
मनातील एकाचे दुसऱ्याला न सांगता समजाव,
पापण्यांच्या सावलीत एक-मेकास जपाव,
कोणी एकास शोधत आले,तर दुसऱ्याच्या डोळ्यात सापडाव,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

मनात एकमेकांच्या कळीगत उमलाव,
मग नजरेत गुलमोहरागत फुलाव,
प्रेमाचा गंध  हवेत पारिजाताकागत पसराव,
मिठीत एकमेकाच्या लाजाळूगत लपाव,
आणि एकदा एकमेकात हरवल्यावर,
कोणालाच न सापडाव,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

..मज अजुनही जगायचे

..मज अजुनही जगायचे


उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे
पेटले बेभान रान
   मज भानावर यायचे


लाजली कळी कळी
   खळी गालावर उमलली
उमलत्या खळीत जळून
   पाकळी बहरली
बहरत्या फुलात मिटुन..... 
   ......मज पाखरु बनायचे
उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे


मन सैर भैर पाखरु
   श्वासावरी तरंगले
पेटला श्वासात गंध
   गंधात भास रंगले
रंगात अंग भिजवुनी...
   .....मज तरंगात गायचे
उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे

उन्मत्त रात्र रेशमी
   विखरुन पाश न्हायली
पाशात दंश लपवुनी
   दरवळली सायली
मोहात मात असुनही....
   ....मज पराभूत व्हायचे
उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे... !

गजरा

गजरा


भरुन आलेल्या ढगांनी
हलक्यानीच रडावं
आणि नेमकं तेंव्हाच वा-यचं
तुझ्या केसावर प्रेम जडावं

बेभानपणे वा-यानी मग
तुझ्या ओल्या केसात वहावं
आणि माझ्या जवळच्या गज-यानी मात्र
हळुच लपुन पहावं

तुझ्या केसातल्या रातराणी गंधानी
माझ्या नसानसात शिरावं
आणि त्या कस्तुरीच्या गंधापुढे
माझ्या भोळ्या गज-यानी हरावं

मग शहाणपणे गज-यानी
हळुच खाली पडावं
आणि तो पडलेला गजरा उचलायला
पाऊल तुझं अडावं

मग मान हलवुन नेहेमीसारखं
ते तुझं गजरा माळणं
आणि भान हरपुन नेहेमीसारखं
माझं वेड्यासारखं भाळणं

त्या भरुन आलेल्या ढगांनी
आता हलक्यानेच हसावं....
आणि तुझ्या केसावर वा-याआधि
माझ्या गज-याचम प्रेम असावं...

गजरा

गजरा


भरुन आलेल्या ढगांनी
हलक्यानीच रडावं
आणि नेमकं तेंव्हाच वा-यचं
तुझ्या केसावर प्रेम जडावं

बेभानपणे वा-यानी मग
तुझ्या ओल्या केसात वहावं
आणि माझ्या जवळच्या गज-यानी मात्र
हळुच लपुन पहावं

तुझ्या केसातल्या रातराणी गंधानी
माझ्या नसानसात शिरावं
आणि त्या कस्तुरीच्या गंधापुढे
माझ्या भोळ्या गज-यानी हरावं

मग शहाणपणे गज-यानी
हळुच खाली पडावं
आणि तो पडलेला गजरा उचलायला
पाऊल तुझं अडावं

मग मान हलवुन नेहेमीसारखं
ते तुझं गजरा माळणं
आणि भान हरपुन नेहेमीसारखं
माझं वेड्यासारखं भाळणं

त्या भरुन आलेल्या ढगांनी
आता हलक्यानेच हसावं....
आणि तुझ्या केसावर वा-याआधि
माझ्या गज-याचम प्रेम असावं...

तू एकदा उमलून जा....

केसातल्या ओल्या धुक्याचे
   ............ रान तू ऊठवून जा...
भडकू दे श्वासात वणवा....
   ............ तू एकदा उमलून जा....


जवळ तू... तू दूर तरीही
बघ चिडवतो हा गार वारा
सुचवतो पाऊस काही
   ............... तू ज़रा उमजुन जा...


थांबायचे नसते तुला तर
भेटायला येतेस का ?
आता जवळ घेस्वप्नात मजला
किंवा
   ...................... झोप तू ऊडवुन जा....


चिंब डोळ्यांच्या किनारी
राहिलो मी कोरडा
आता बुडव तू मद्यात मजला
किंवा...
   .....................पापण्या उघडून जा....


बेईमान सारे शब्द माझे
गुंतले तुझ्या कवितेमध्ये
ओढ़ मलाही कवितेत... किंवा
   .................... पान हे ऊलटुन जा


चंद्रास माझ्या विरहपीडा
पौर्णिमेच्या धुंद राती
झटक तू ... केस आता तुझे अन...
   ..................चांदणे उधळुन जा ...



घाव झेलायास मागे
मी आता उरलो कुठे ?
काही तुला देण्यास नाही
   ............ जे राहिले ... उचलून जा....

तू एकदा उमलून जा....

केसातल्या ओल्या धुक्याचे
   ............ रान तू ऊठवून जा...
भडकू दे श्वासात वणवा....
   ............ तू एकदा उमलून जा....


जवळ तू... तू दूर तरीही
बघ चिडवतो हा गार वारा
सुचवतो पाऊस काही
   ............... तू ज़रा उमजुन जा...


थांबायचे नसते तुला तर
भेटायला येतेस का ?
आता जवळ घेस्वप्नात मजला
किंवा
   ...................... झोप तू ऊडवुन जा....


चिंब डोळ्यांच्या किनारी
राहिलो मी कोरडा
आता बुडव तू मद्यात मजला
किंवा...
   .....................पापण्या उघडून जा....


बेईमान सारे शब्द माझे
गुंतले तुझ्या कवितेमध्ये
ओढ़ मलाही कवितेत... किंवा
   .................... पान हे ऊलटुन जा


चंद्रास माझ्या विरहपीडा
पौर्णिमेच्या धुंद राती
झटक तू ... केस आता तुझे अन...
   ..................चांदणे उधळुन जा ...



घाव झेलायास मागे
मी आता उरलो कुठे ?
काही तुला देण्यास नाही
   ............ जे राहिले ... उचलून जा....

शहाण्या माणसांनी कधीच नाही प्रेमात पडावं

प्रेम तर खूप केले  तिच्यावर, बहुतेक कोणी   केले  असावं

पण  ती  मात्र   'वेडा आहे तो'  बोलत  सारख  हसत राहावं

मला  तर करमेच  ना  ! वाटत  होते  सारखे  तिला  पाहावं

बाकीच  सगळे  विसरून तिची  आठवण  काढत  कोणत्यातरी  कोपरयात  बसावं

सगळे  होते  सोबत  माझ्या  तरी  वाटत  होते कोणी सोबत  नसावं

एवढा   आंधळा   झालो होतो   मी  डोळे  उघडे  होते  तरी  काही  नाही  दिसावं

मनात  वाटले  एकदा  आपल्या  मनातले  तिच्यासमोर  बोलून  तरी  बघावं

पण  नसेल  तिचे  प्रेम  आपल्यावर, नेमके  त्याच  वेळी  आठवावं

तिला  सारख  पाहण्यासाठी  नेहमी  तिच्या  मागे  जात  जावं

ती  चालत  असली  आपल्यासमोर  तर  आपल्याला  जायचं  कुठे  हेच  विसरावं

एकदा  काय  माहित  कसे  काय? पण  तिनेच  येवून  माझ्याची  बोलावं

बोलायचं  कसले  तिचा  सर्व  राग  माझ्यासमोर  काढावं

माझ्या  मागे  कधीच  लागू  नकोस, असे  धमकून  जावं

विचार  केला  हि  नाही  तर  नाही  चला  दुसरीला  पटवावं  

पण  कसले  काय ? सगळ्या  पोरींमध्ये  हिचेच  चित्र  दिसावं

बोललो  सोडून  द्यावं  सगळे  जीवनात  तरी  लक्ष  घालावं

बहुतेक  प्रेमात  सगळ्याचं  असच  होत  असावं

जे  आपले  असेल  ते  आपल्यालाच  परत  भेटावं

प्रेमात  जो  पडला  त्याने  संपूर्ण  आयुष्य  कशाला  रडत  घालवावं?

येईल  दिवस  एकदा  तिनेच  आपल्यासमोर  येवून  रडावं

प्रेम  वाईट   नसले  तरी  सगळ्यांनी  तिथे  कशाला  जावं?

आयुष्यात  भरपूर  काही  आहे  करण्यासारखं  तेथे  लक्ष  द्यावं

खरे  प्रयत्न  करून   आपण  सुद्धा  प्रसिद्ध  वाहावं

कशाला  पाहिजे  प्रेयसी ?? त्यापेक्षा  आपल्यावरच  खूप  प्रेम  करावं

जीवनात  न  रडता  नेहमी  हसावं  आणि  हसवत  राहावं
   

 :) :) :) ;) ;) ;)

भेटूया पुन्हा कधीतरी

भेटूया पुन्हा कधीतरी
कुठल्याशा अपुऱ्या कवितेच्या ओळीत
अर्धवट राहिलेल्या अनवट सुरावटीत
भेटूया पुन्हा कधीतरी
माझ्या हृदयात तुझ्यासाठी झुराझुरणाऱ्या झऱ्याकाठी
स्वप्नाच्या प्रदेशात अज्ञात तरुतळी
मग पडतील केशर उन्हाचे सडे
हळदुली शेतं मनात डोलायला लागतील
निळेशार स्फटिक-झरे झुलझुलातील
सारेच कसे मंतरलेले होऊन जाईल
त्यावेळी तू आणि मी
दोन प्रेमी युवामाळी
हातात हात घेऊन बसू
तुझ्या भस्मी डोळ्यांना
मी माझे डोळे देईन
गुलाबी ओठांना ओठ देईन..

तुझं आणि माझं जमणार तरी कस

तुझं आणि माझं जमणार तरी कस

तुला लागते चहा, मला लागते coffe ,
तुला नाही आवडत , मी उलटी ghataleli टोपी,
तुला वाटते थंडी, मला होते गरम
तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम

झोपतेस तू लवकर आणि उट्तेस पहाटे,
आवडत नाही तुला boxing आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसत क्रिकेटशिवाय gataytar
तुझं आणि माझं जमणार तरी कस

फिरायला आवडत  आवडत तुला शॉपिंग
कपड्याबद्दल बोलतेस अगदी vidaout stopping
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
काळात नाहीन रंग राखाडी आहे कि kala
तुझं आणि माझं जमणार तरी कस

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येती एकटाच इतरांचं न ठरता,
ती मात्र बघतेस मैत्रिणींची वाट,
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ,
तुझं आणि माझं जमणार तरी कस

 मला नसतात लक्षात बर्थ्दाय्च्या तारखा
जाताना बजावलं तरी काम विसरतो सारखा,
तुला मात्र आठवते पाचवी ची मैत्रीण
बारीक सारीक नजर डोळे आहेत कि दुर्बीण
तुझं आणि माझं जमणार तरी कस

उन आणि सावली राहतात न जसे
अग तुझं आणि माझं जमेल का तसं.........

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,

पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,

ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,

ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,

तू मला आधार देशील का ??

यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,

ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,

विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,

अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,

कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

आता कुठॆ सुरवात ही झाली

आता कुठॆ सुरवात ही झाली

आता कुठॆ सुरवात ही झाली.................
मानात नकार आणि ऒठावर हॊकार
वॆळ पडली कि घॆतलि माघार
जगाची कॆली त्यानॆ रित स्विकार

हॊतॆ गाठायचॆ यशाचॆ शिखर
सुरु झाली त्याचि धडपड,
गॆला जीव कुणचा न कॆली फिकर

हॊती त्यास कुणाचि परवा
न राहिलॆ जगाचॆ भान
जिंकित गॆला तॊ नॅहमिच
चढला मग त्यास गुमान

पादाक्रांत करीत गॆला एक एक टप्पा
प्रॅमाच्या झाल्या नुसत्याच गप्पा
वापरलॅ त्यानॆ तिलाही नॅहमी
प्रॅमाच्या हॊता डाव फसवा

म्हणतात प्रॆम आंधळॆ असतॆ
तिहि कुठॆ अपवाद हॊती
सवॅ काहि दॆऊनि
राहिली रीत्या हाती

कळाली तीलाहि जगाचि रित
शॆवटचा डाव तिनॆ खॆळिला
उत्तुंग शिखराचा मॊह त्यालाही पडला

लाविलॆ पणास सवॅ,खॆळली शॆवटचि बाजि
कळायला झाला उशीर गमावलॆ सवॅ काहि
हपापलॆलॆ चॆलॆहि माग दुर झालॆ
हॊती आता खरी परिक्शा

मनातुनि आवाज आला
दिली साद मग त्यानॆ तीला,
नॆहमी प्रमाणॆ ती आलि
घॆउनि हातात हात म्हणालि
आता कुठॆ सुरवात ही झाली

जमेल का रे तुला कधी

जमेल का रे तुला कधी
माझ्या डोळ्यात पहाण,
न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर ,
त्याच्यामध्ये  शोधात राहणं .

जमेल का रे तुला कधी
माझ्याशी तासंतास गप्पा मारणं,
मी काहीही न बोलता
माझ्या मनातलं सर्व काही ओळखण

जमेल का रे तुला कधी
माझ्यावर नीतांत  प्रेम करणं,
हळुवार माझ्या भावनांना
अलगदपणे समजून घेणं

जमेल का रे तुला कधी
माझा हात हातात घेणं
मी तुझीच आहे
ह्याची शाश्वती मला देण.

जमेल का रे तुला कधी
माझ्य्पासून दूर होण
जमल तरी जाऊ नकोस
मलाच सहन होणार नाही तुझ दुरावण.

तू म्हणजे एक स्वप्न.......

तू म्हणजे एक स्वप्न.................
तू म्हणजे एक स्वप्न.................
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे थारनारे..!
तू म्हणजे एक स्वप्न.................
मनात दडून ठेवलेले,
कितीही भासविले तरीही , डोळ्यातून ओघळनारे !
तू म्हणजे एक स्वप्न.................
श्वासाश्वासात भिनलेले,
तरीही दूर दूर असणारे,
तू म्हणजे एक स्वप्न.................
तुज्या आठवणीत जगणारे ,
मित्र जवळ असुनही , तुलाच शोधत फिरनारे !
तू म्हणजे एक स्वप्न.................
दिवसा सुद्धा छळनारे ,
ती सोबत नसतानाही , असल्याचे भासविनारे !
तू म्हणजे एक स्वप्न.................
अथावानिचा कोंडवाडा करणारे ,
अनेकदा सावरले तरीही , पुन्हा सर्व पसरनारे !
तू म्हणजे एक स्वप्न.................
माजे कधीही न जालेले,
तू दूर असलीस तरीही , तुज्या सुखासाथ तळमळनारे !
तू म्हणजे एक स्वप्न.................
तुज्या विरहात एकटेच जगणारे ,
तू जिंकाविस म्हणून, कितेकदा स्वत:लाच हरविनारे
तू म्हणजे एक स्वप्न.................
येण्याच्या तुज्या, त्याच वळनावर वाट पाहणारे
तू म्हणजे एक स्वप्न.................
शब्दाशाब्दात विणलेले,
मला मात्र नव्या कवितेला वाव देणारे
तू म्हणजे एक स्वप्न........

आठवण माझी आली कधी

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षनान्म्धले
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या ratri घेतलेल्या शपथेचा
शब्द न  शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत  घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश  लाटेच  वीव्ह्लन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

----अनघा----

का रे वेड्या अस करतोस??

का रे वेड्या अस करतोस??


नेहमी मला लपून-छपून बघत असतोस
पण मी दिसली नाही की मग मात्र गोंधळून जातोस
इमारतीखाली येउन रोज मी जाण्याची वाट पाहत असतोस
पण मी आले की मात्र आडोश्याला जाउन लपून बसतोस

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

लांबून नजरेस नजर देतोस
पण जवळ आलास की मात्र लाजून डोळे झुकवतोस
"आज काहीही झाल तरी तिच्याशी बोलायच" अस ठरवून येतोस
पण बोलण्यासाठी अगदी जवळ येउन देखील, न बोलता निघून जातोस

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

रोज स्वप्नात येउन छळत असतोस
तिथे मात्र खूप वेळ बोलत असतोस
आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतोस
पण समोर येउन एक लाल गुलाबही न देऊ शकतोस

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

कधी कधी वाटत तुझ्याशी स्वतहून जाउन बोलाव
"मैत्री करणार का?" अस तूला विचाराव.
मैत्रीतच मग तुझ्या मनातल जाणून घ्याव.
पण तू माझ्याबद्दल काय विचार करशील
ह्या विचाराने मन माझ घाबराव.

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

मलाही आहे तुझ्याशी खूप सार बोलायच
मनात असलेल सर्व काही सांगायच
आपल्या सुख-दू:खांना वाटून घ्यायच
पण तू पुढाकार घेत नाहीस ह्याला मी तरी काय कराव?

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

आता तुम्हीच सांगा मला
आमच्या ह्या अबोल प्रेमाला
मी बोलक तरी कस कराव?

--गौरव देसाई

स्वप्न

स्वप्न
उल्हासित मनाने पाप्न्याना झुकवले,
मनामधिल भाव नयनान्मध्ये उतरले.

आयुष्य कसे सुन्दर असावे
केवळ तुझे नि माझे विश्व समावलेले असावे

परस्परांच्या सहवासात आयुष्य बहरून जावे
उगवनाऱ्या नव्या दिवसाने काहीतरी नवे घेउन यावे

एक न एक दिवस केवळ तुझ्याच समवेत घालवावा
केवळ तुझ्याच बहुपाशत  जीवनाचा नवा रंग विरावा

तुझी नि माझी साथ अशी जन्मान्तारिची असावी
वेगले पणाची चाहुलही कधी आपल्या सहवासाला न यावी

परन्तु..............

आशा स्वप्नांची देखिल एक मर्यादा जाणवते
आणि नयनान्मधिल ती निराळी स्वप्ने
आस्वान्मध्ये विरून जाते

समजूत...

समजूत...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
समोर असलीस की डोळे भरून बघून घेतो तुला,
नसलीस की तुझ्या आठवणीत जगून घेतो तुला,
असण्या-नसण्याच्या सीमांच्या व्याख्येत माझं प्रेमच बसत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
आजही रोज संध्याकाळी नकळत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतो,
कधीतर चक्क आपल्या नेहमीच्या ठिकाणीही जाऊन बसतो,
माझ्या वागण्याचे कधी मलाच संदर्भ लागत नाहीत,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
तू येणार नाहीस हे माहीत असतं मला, तरीही वाटतं,
येशीलच ऐकून माझी अधीर साद...
चंद्र-चांदण्यांतही असतील ना गं काही वाद,
पण तरीही चंद्र आकाशात आला, की चांदणंही आल्याशिवाय राहत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
शिकलोय मी आता तुझ्यावाचून जगणं,
तुझ्या भासांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून टाकणं,
आता कधी मला तुझं नसणं सलत नाही,
कारण तेव्हा जणु माझाच मी उरत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही....

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं.....

पाय-या उतरता उतरता

पाय-या उतरता उतरता हलकेच ठेच लागते आणि आठवणीनच्या गाभा-याला उमाळा येतो गर्द झाडीतल्या आठवणी फिरत फिरत पून्हा एका क्षणी एकवटतात जेव्हा भानावर येतं मन तेव्हा पाया-या उतरून झालेल्या असतात त्या जगातलं मन या जगात स्थिरावतं एक बिंदु चमकतो अन आठवणीतला बहर पुन्हा पसरतो पाय-या उतरताना उतरणीचं नैराश्य नसतं कारण कारण दक्षिणायनात रमलेल्या मनाला कळतंच नाही कधी उत्तरायण चालु होतं..........

रंगबेरंगी नाती...

रंगबेरंगी नाती...
जीवन वाटेवर अनेक जुळतात नाती
काही कोमेजती,काही फ़ुलतात नाती...
दु:ख देती तसेच सुखावतात नाती
कुणास आयुष्यभर छळतात नाती...

वात्सल्य,प्रेम,मायेत झुलतात नाती
विश्वासाने हळूहळू खुलतात नाती...
कुठे हरवती कुठे मिळतात नाती
क्षणिक स्वार्थापोटी भुलतात नाती...

हातात हात घेऊनी चालतात नाती
सुखात जवळ दु:खात पळतात नाती...
काही पणती सारखी जळतात नाती
कायमची ह्रुदयाला काही सलतात नाती...

मनात जरी रुजतात नाती

प्रेम, मायेने हसतात नाती...
अविश्वास होता थोडासा
एकमेकांवर का रुसतात नाती...?

काही वळणावर हरवतात नाती
स्वार्थापोटी मिरवतात नाती...
आपुलकी कुठे असते हल्ली
माणसे कुठे टिकवतात नाती...?

घास प्रेमाचा भरवतात नाती
धडा नात्यांचा गिरवतात नाती
गैरसमज मनात जागता थोडासा
कायमची का दुरावतात नाती..?